टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी 2 फिडरचे नियोजित देखभाल आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात येणार आहे. या फिडरवर अवलंबून असलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 150 द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र तसेच 100 द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील वीजपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. परिणामी, कल्याण व डोंबिवली परिसरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
advertisement
Mumbai Local: रविवारचं काम आजच करा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, इथं चेक करा वेळापत्रक
या भागात पाणीपुरवठा बंद
महापालिकेच्या माहितीनुसार, मुख्यत: कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रोड परिसर यांसारख्या शहरी भागांतील पाणी खंडित राहणार आहे. तसेच मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आदी ग्रामीण भागांतही याचा परिणाम होणार आहे.
महापालिकेने नागरिकांना 30 जून रोजीच पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली देखभाल पूर्ण करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केलं आहे.






