ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ठाणे माहपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांड्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण क्षमतेने पाणी पंपिंग होत नाही. तसेच गढूळपणामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.
advertisement
Kalyan-Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कारण काय?
पाणी जपून वापरा
पिसे पंपिंग स्टेशनमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवार, 27 जुलै रोजी दुपारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील 2 दिवस अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागेल. तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.