मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे काढण्यात आल्याने पालिकेला पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला आहे. या विद्युत आणि तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या काळात पालिकेच्या उदंचन आणि जलशुद्धीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने महावितरणच्या विनंती अर्जावरून पालिकेने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
बारावे, मोहिली आणि नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कोळीवाडा, बंदरनगर आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात मोहिली उदंचन केंद्रातून मंगळवारी पाणी येणार नाही. त्यामुळे मंगळवारी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांनी 9 तास पुरेल इतके पाणी भरून ठेवावे. काम पूर्ण झाल्यावर पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे.






