ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलं असून नागरिकांनी याची वेळेवर नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. शटडाऊन कालावधीत ठाणे शहरातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता) तसेच कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय वागळे प्रभागातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव या परिसरांतील नागरिकांनाही या शटडाऊनचा फटका बसणार आहे.
advertisement
पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य असेल तितका पाण्याचा साठा करून ठेवावा आणि या कालावधीत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना या तात्पुरत्या अडचणीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.