TRENDING:

Water Update: मुंबईकरांना वर्षभर टेन्शनच नाही? कोणत्या धरणात किती पाणीसाठा

Last Updated:

Water Update: मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून पाणीपुरवठा होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मायानगरी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या ठिकाणांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या 12,90,817 मिलियन लीटर प्रति दिन (एमएलडी) म्हणजेच 89.18 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. ही आकडेवारी 8 ऑगस्टपर्यंतची असून, शहराला दररोज सुमारे 3,900 एमएलडी पाण्याची गरज असते. त्यामुळे हा साठा पुढील सुमारे 331 दिवस, म्हणजेच मे 2026 पर्यंत पुरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आगामी वर्षभर मुंबईला पाणीटंचाई भासणार नाही, अशी शक्यता आहे.
Water Update: मुंबईकरांना वर्षभर टेन्शनच नाही? कोणत्या धरणात किती पाणीसाठा
Water Update: मुंबईकरांना वर्षभर टेन्शनच नाही? कोणत्या धरणात किती पाणीसाठा
advertisement

मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही ठिकाणी पाण्याचा समाधानकारक साठा झाला आहे. मोडक सागर 99.99 टक्के भरले असून, तानसा 98.41टक्के, मध्य वैतरणा 94.76 टक्के आणि भातसामध्ये 86.57 टक्के पाणी आहे. याशिवाय, अप्पर वैतरणा 82.76 टक्के आणि तुळशी तलाव 84.64 टक्के भरले आहेत. विहार तलावामध्ये सध्या केवळ 23.28 टक्के साठा आहे. सात जलाशयांचा एकूण साठा समाधानकारक असल्याने मुंबईला पाणीटंचाईचा धोका नाही.

advertisement

Mumbai Water News: मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मागील काही वर्षांशी तुलना केली असता यंदाच्या वर्षीचा पाणीसाठा थोडा कमी असला, तरी 2023 पेक्षा अधिक आहे. 2024 मध्ये 13,05,948 एमएलडी आणि 2023 मध्ये 11,72,967 एमएलडी साठा झाला होता. अद्याप पावसाळा सुरू असल्यामुळे आगामी काळात पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण चांगले राहिले तर काही तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

advertisement

प्रशासन आणि जल प्राधिकरणाने योग्य नियोजन केलं तर उपलब्ध पाणीसाठा अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल. एकूणच मुंबईकरांना या वर्षी पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही.

मराठी बातम्या/मुंबई/
Water Update: मुंबईकरांना वर्षभर टेन्शनच नाही? कोणत्या धरणात किती पाणीसाठा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल