खर्च एका एकरात फक्त 6 हजार रुपये, शेतकरी करतोय 10 वर्षांपासून लाखोंचं उत्पन्न मिळवून देणारी ही शेती PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
पंढरपूर तालुक्यातील एक शेतकरी गेल्या 10 वर्षांपासून रताळ्याची शेती करतोय. विशेष म्हणजे या रताळ्यांच्या शेतीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.
advertisement
1/7

गेल्या काही काळात सोलापूरच्या शेती क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करत आहेत.
advertisement
2/7
पंढरपूर तालुक्यातील एक शेतकरी गेल्या 10 वर्षांपासून रताळ्याची शेती करतोय. विशेष म्हणजे या रताळ्यांच्या शेतीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. सुधीर चव्हाण असे बाभूळगाव येथील या शेतकऱ्याचे नाव असून लोकल18 सोबत बोलताना त्यांनी आपल्या रताळे शेतीबद्दल माहिती दिलीये.
advertisement
3/7
बाभूळगाव येथील शेतकरी सुधीर चव्हाण हे पूर्वी पारंपरिक शेती करत होते. परंतु, 10 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात तरकारी स्वरुपात रताळ्याची शेती करण्यास सुरुवात केली.
advertisement
4/7
50 गुंठे क्षेत्रात ते रताळ्याची लावगड करतात. त्यासाठी माती फिरवणाऱ्या नांगराने शेत नांगरून घेतली जाते. त्यानंतर रोटाव्हेटरच्या सहाय्याने शेताची 2 ते 3 वेळा माती भुसभुशीत केली जाते आणि मग रताळ्याची लागवड केली जाते, असे शेतकरी सांगतात.
advertisement
5/7
रताळे लागवडीला एका एकरात फक्त 5 ते 6 हजार रुपये इतका खर्च येतो. या पिकाला कोणताही रोग लागत नसल्यामुळे फवारणीची गरज पडत नाही, असं शेतकरी सुधीर चव्हाण सांगतात. मागील वर्षी चव्हाण यांना सव्वा एकरात 600 पिशवी रताळे निघाले होते. त्यातुन 3 लाख रुपयांचे उत्पन्न हातात आले. तर यंदा देखील सव्वा एकरात रताळ्याची लागवड केली असून 300 ते 400 पिशवी माल निघण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच यंदा रताळ्याला 20 रुपये दराने जरी भाव मिळाला, तरी 4 ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे चव्हाण सांगतात.
advertisement
6/7
भारतात रताळ्याची लागवड सर्व राज्यांत कमी-अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हे पीक घेतले जाते. भारतात मुख्यत: पांढऱ्‍या अथवा लाल सालींची रताळी लागवडीखाली आहेत.
advertisement
7/7
आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळ्याला उपवासाच्या मेनू मध्ये मानाचे स्थान असते. त्याचे वेगवेळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्याने नियमित खण्यासोबतच लोक उपवासासाठी रताळ्याला पसंती देतात. त्यामुळे फराळ म्हणून रताळ्याला मोठी मागणी असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
खर्च एका एकरात फक्त 6 हजार रुपये, शेतकरी करतोय 10 वर्षांपासून लाखोंचं उत्पन्न मिळवून देणारी ही शेती PHOTOS