TRENDING:

Arijit Singh: 15 वर्षांचं करिअर झटक्यात संपवलं, पण प्लेबॅक सिंगिग सोडल्यावर आता अरिजीत काय करणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:
Arijit Singh Retirement: करिअरच्या शिखरावर असताना अरिजीतने अचानक निवृत्ती घेतली. मात्र, आता प्लेबॅक सिंगिंगनंतर अरिजीत काय करणार याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
advertisement
1/7
प्लेबॅक सिंगिग सोडल्यावर आता अरिजीत करणार काय? समोर आली मोठी अपडेट
ज्याच्या आवाजाशिवाय प्रेम, विरह किंवा देशभक्ती अपूर्ण वाटते, तो अरिजीत सिंग आता पुन्हा कधीही चित्रपटांसाठी गाणार नाही. ही बातमी ऐकून कोट्यवधी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. विशेष म्हणजे, 'मातृभूमी' आणि 'गहरा हुआ' सारखी त्याची गाणी चार्टबस्टरवर ट्रेंडिंग असतानाच अरिजीतने हा बॉम्ब टाकला आहे.
advertisement
2/7
करिअरच्या शिखरावर असताना या गायकाने अचानक निवृत्ती का घेतली? याचे उत्तर स्वतः अरिजीतनेच दिले आहे. अरिजीतने त्याच्या 'X' आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या निर्णयाचा खुलासा केला.
advertisement
3/7
तो म्हणाला, "या निर्णयामागे एक नाही, तर अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मला खूप लवकर कंटाळा येतो! मी बऱ्याच काळापासून स्टेजवर तीच ती गाणी वेगळ्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला त्यात नावीन्य हवं असतं. आता मला या प्लेबॅक प्रकाराचा कंटाळा आलाय. मला जगण्यासाठी आणि कलेसाठी काहीतरी वेगळं संगीत तयार करण्याची गरज आहे."
advertisement
4/7
अरिजीतने आणखी एक भावनिक कारण सांगितलं, ते म्हणजे त्याला आता नवीन गायकांना संधी मिळताना पाहायचं आहे. नव्या दमाच्या कलाकारांना पुढे येताना पाहून त्याला स्वतःला मोटिव्हेशन मिळतं, असं तो म्हणाला.
advertisement
5/7
चाहत्यांना वाटलं होतं की अरिजीत आता गाणंच सोडणार की काय? पण तसं नाहीये. अरिजीतने स्पष्ट केलं की, तो पार्श्वगायक म्हणून नवीन चित्रपट साइन करणार नाही. मात्र, तो स्वतःचे स्वतंत्र अल्बम तयार करणार आहे.
advertisement
6/7
सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटातील 'मातृभूमी' हे अरिजीतने पार्श्वगायक म्हणून गायलेलं शेवटचं गाणं ठरलं आहे. आता अरिजीत चित्रपटांच्या पडद्यामागचा आवाज न राहता, थेट स्टेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्स आणि स्वतःच्या म्युझिक प्रोडक्शनच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या संपर्कात राहणार आहे.
advertisement
7/7
सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटातील 'मातृभूमी' हे अरिजीतने पार्श्वगायक म्हणून गायलेलं शेवटचं गाणं ठरलं आहे. आता अरिजीत चित्रपटांच्या पडद्यामागचा आवाज न राहता, थेट स्टेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्स आणि स्वतःच्या म्युझिक प्रोडक्शनच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या संपर्कात राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Arijit Singh: 15 वर्षांचं करिअर झटक्यात संपवलं, पण प्लेबॅक सिंगिग सोडल्यावर आता अरिजीत काय करणार? समोर आली मोठी अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल