एकेकाळी चालवली पानटपरी, खायलाही नव्हते पैसे, डोळ्यात पाणी आणणारी भाऊंची कहाणी!
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. कॉमेडीच्या उत्तम टायमिंगनं भाऊ कदमनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. भाऊ कदम यांनी आज लोकांना खळखळून हसवून प्रसिद्धी आणि पैसे मिळवला असला तरी त्यांनी एकेकाळी हलाखीचे दिवस काढले आहेत. काय आहे भाऊंची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या.
advertisement
1/8

एकेकाळी हलाखीचे दिवस काढणाऱ्या भाऊ कदमने आज स्वत:च्या हिंमतीवर प्रसिद्धी, पैसा, श्रीमंती सगळं काही मिळवलं आहे. मुलगा, नवरा, बाप, अभिनेता अशा सगळ्या जबाबदाऱ्या ते उत्तमरित्या सांभाळतात.
advertisement
2/8
पण भाऊंचा हा प्रवास फार सोपा नव्हता. त्यांनी कष्टात आयुष्य काढलं आहे.
advertisement
3/8
एकेकाळी भाऊंची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पानटपरी चालवली.
advertisement
4/8
भाऊ कदम मुंबईतील डोंबिवली भाग्य राहायचे. तिथे त्यांनी छोटी मोठी कामं करत कुटुंबाचा आर्थिक भार उचलला होता.
advertisement
5/8
भाऊ कदम भावासोबत मतदार नावं नोंदणीची कामं करायचे, त्यानंतरच त्यांनी छोटी पानटपरी सुरु केली.
advertisement
6/8
ही कामं करत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. त्या काळात ते नाटकांमध्ये काम करायचे.
advertisement
7/8
त्यांचं 'जाऊ तिथे खाऊ' हे नाटक तुफान गाजलं आणि त्यांच्या करिअरला चालना मिळाली.
advertisement
8/8
सुरुवातीला भाऊ कदम याना एका नाटकात काम करण्यासाठी 100 रुपये मानधन मिळायचं. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपलं विशेष स्थान निर्माण केलं. चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडसाठी भाऊ कदम तब्बल 80, 000 रुपये मानधन घ्यायचे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकेकाळी चालवली पानटपरी, खायलाही नव्हते पैसे, डोळ्यात पाणी आणणारी भाऊंची कहाणी!