भारताची सर्वात महागडी फिल्म बनवली, शेवटची नायिका हेमा मालिनी; कंगाल झाला, बोन मॅरो कॅन्सरने मृत्यू
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. त्यांच्या चित्रपटांतील भव्य सेट्स, संवादांचे सादरीकरण आणि शक्ती, त्याग आणि ओळख यांसारख्या विषयांचा त्यांच्या चित्रपटात प्रामुख्याने समावेश होतो. त्यांना देशातील सर्वोच्च चित्रपट सन्मानासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून इतिहास आणि साहित्य पुन्हा जिवंत केल्यामुळे राजकीय नेत्यांनी आणि समीक्षकांनी त्यांच्या कामाचे उघडपणे कौतुक केले.
advertisement
1/8

भारतीय सिनेसृष्टीत एक असे चित्रपट निर्माते होते, ज्यांचे कायमच चित्रपटाविषयी भव्य दिव्य दृष्टिकोन होता. त्यांच्या चित्रपटांची ओळख ही चित्रपटातील भव्य व्याप्ती, उत्कृष्ट अभिनय आणि गंभीर विषयांसाठी होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक महाकाव्ये रचली होती. त्यांच्यावर शेक्सपियर आणि नाटकांचा खोलवर प्रभाव होता.
advertisement
2/8
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. त्यांच्या चित्रपटांतील भव्य सेट्स, संवादांचे सादरीकरण आणि शक्ती, त्याग आणि ओळख यांसारख्या विषयांचा त्यांच्या चित्रपटात प्रामुख्याने समावेश होतो. त्यांना देशातील सर्वोच्च चित्रपट सन्मानासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून इतिहास आणि साहित्य पुन्हा जिवंत केल्यामुळे राजकीय नेत्यांनी आणि समीक्षकांनी त्यांच्या कामाचे उघडपणे कौतुक केले.
advertisement
3/8
तो व्यक्ती म्हणजे, प्रसिद्ध दिग्दर्शक- अभिनेता सोहराब मोदी, सोहराब मोदी हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजांपैकी एक आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि स्टुडिओचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या चित्रपटांमध्ये पारशी नाटकाचे अनेक पैलू, शेक्सपियरियन ड्रामा आणि राष्ट्रवादची झलक या सर्वांचा मिलाफ पाहायला मिळत होता. ज्यामुळे त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजनासाठीच नाहीतर, माहितीपटासाठीही ओळखले जात होते.
advertisement
4/8
2 नोव्हेंबर 1987 साली मुंबईमध्ये सोहराब यांचा जन्म झाला होता. सोहराब यांना चित्रपटसृष्टीची पहिली ओळख त्यांचा भाऊ केकी मोदी यांच्या ट्रॅव्हलिंग प्रोजेक्शन बिजनेसमुळे आणि 'किस्मत' सिनेमाच्या मालकीमुळे झाली. त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मानसशास्त्र आणि दृश्य कहाणी सांगण्याच्या पैलूंना आकार दिला. ज्यामुळे तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या सीमा ओलांडणाऱ्या कारकिर्दीचा पाया रचला गेला.
advertisement
5/8
फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी सोहराब यांनी यांनी पारसी थिएटरमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले, जिथे संवाद, उच्चार आणि त्यातील बारकावे यांसह अनेक गोष्टींचा अभ्यास केला. 1923 मध्ये त्यांनी ग्वाल्हेरमध्ये आर्य सुबोध नाटक मंडळीची स्थापना केली, जी शेक्सपियरच्या नाटकांच्या उर्दू रूपांतरावर आधारित होती. ही रंगभूमीची पार्श्वभूमी नंतर त्यांच्या चित्रपटांच्या भाषा, लय आणि गांभीर्याचे वैशिष्ट्य बनली.
advertisement
6/8
1931 मध्ये "आलम आरा" नंतर जेव्हा संवाद साधणारे चित्रपट भारतात आले तेव्हा मोदींना लगेचच लक्षात आले की थिएटरचे भविष्य चित्रपटात आहे. त्यांनी आपल्या भावासोबत स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली आणि "हॅम्लेट" आणि "किंग जॉन" चे रूपांतर "खून का खून" (१९३५) आणि "सईद-ए-हवस" (१९३६) सारख्या चित्रपटांत केले. जरी हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले नसले, तरी या चित्रपटांच्या माध्यमातून सोहराब मोदी यांना चित्रपट निर्मितीचे धडे गिरवायला मदत मिळाली.
advertisement
7/8
1936 मध्ये सोहराब मोदी यांनी मिनर्व्हा मूव्हीटोनची स्थापना केली, या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून प्रेक्षकांना शिकवण मिळणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात होती. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये "तलाक" (१९३८) मध्ये महिलांचा घटस्फोटाचा अधिकार आणि "मीठा जहर" (१९३८) मध्ये मद्यपान यासारख्या सामाजिक मुद्द्यांना संबोधित केले होते, ज्यामुळे सामाजिक संदेश प्रेक्षकांना मिळू शकतो, ही बाब लक्षात आली.
advertisement
8/8
फिल्मी करियरच्या शेवटच्या टप्प्यात, त्यांनी फक्त काही चित्रपट दिग्दर्शित केले परंतु अभिनयात काम करणे कायम ठेवले, विशेषतः "रझिया सुलतान" (१९८३) मध्ये वजीरची भूमिका साकारली. त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आर्थिक अडचणी आणि ढासळत्या तब्येतीचा सामना करावा लागला. 1984 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी बॉन मॅरो कँसरमुळे निधन झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारताची सर्वात महागडी फिल्म बनवली, शेवटची नायिका हेमा मालिनी; कंगाल झाला, बोन मॅरो कॅन्सरने मृत्यू