TRENDING:

'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळपाणी पिऊ नये; जाणून घ्या सविस्तर माहिती

Last Updated:
सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणातील उष्माही फार वाढला आहे. अशा हवामानामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हेल्दी ड्रिंक्स पिण्याला प्राधान्य दिलं जातं. हेल्दी ड्रिंक्समध्ये नारळपाण्याचाही समावेश होतो. हे एक असं नैसर्गिक पेय आहे ज्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्वचेचं आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील नारळ पाणी प्रभावी आहे. आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, नारळाच्या पाण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. काही आजारांमध्ये नारळपाणी प्यायल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते.
advertisement
1/11
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळपाणी पिऊ नये; जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणातील उष्माही फार वाढला आहे. अशा हवामानामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हेल्दी ड्रिंक्स पिण्याला प्राधान्य दिलं जातं.
advertisement
2/11
हेल्दी ड्रिंक्समध्ये नारळपाण्याचाही समावेश होतो. हे एक असं नैसर्गिक पेय आहे ज्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात.
advertisement
3/11
त्वचेचं आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील नारळ पाणी प्रभावी आहे. आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, नारळाच्या पाण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. काही आजारांमध्ये नारळपाणी प्यायल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते.
advertisement
4/11
डायबेटिसच्या रुग्णांनी मर्यादित प्यावं: ज्यांची ब्लड शुगर लेव्हल जास्त असते अशा व्यक्ती दिवसभरात एका नारळातलं पाणी प्यायला हरकत नाही.
advertisement
5/11
डायबेटिसच्या रुग्णांनी नारळाच्या आतील क्रीम खाणं टाळलं पाहिजे. या क्रीममुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
advertisement
6/11
पचनशक्ती कमकुवत असेल तर टाळा नारळपाणी: जर पचनशक्ती कमकुवत असेल तर नारळपाणी पिऊ नये. नाहीतर जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात असलेले लॅक्सेटिव्ह गुणधर्म पोटाला जास्त सक्रिय करतात. जर तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या आणि जुलाब होत असतील तर नारळ पाणी पिऊ नये.
advertisement
7/11
सारखं लघवीला जावं लागण्याची समस्या वाढू शकते: नारळाच्या पाण्यात डाययुरिटिक इफेक्ट असतो. त्यामुळे वारंवार लघवीला लागते. एक ग्लास नारळपाणी प्यायल्यानंतर तुम्हाला वारंवार लघवी येऊ शकते.
advertisement
8/11
अधूनमधून नारळपाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, दररोज ते प्यायल्याने लघवीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
advertisement
9/11
किडनीवर परिणाम: जास्त प्रमाणात नारळपाणी प्यायल्याने वारंवार लघवीला होते. किडनी आपल्या शरीरातील विषारी द्रव्यं लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतात. पण, शरीरात टॉक्सिन नसेल तर किडनीवर दबाव येतो आणि किडनीचं आरोग्य बिघडतं. ज्यांना किडनीशी संबंधित समस्या किंवा लघवीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी नारळपाणी पिऊ नये.
advertisement
10/11
ब्लड प्रेशर कमी असल्यास टाळा नारळपाणी: ज्यांचं बीपी कमी असतं किंवा बीपीची औषधं घेत आहेत त्यांनी नारळपाणी पिऊ नये. क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनानुसार, नारळाच्या पाण्यात असलेलं पोटॅशियम बीपी नियंत्रित करण्यास मदत करते.
advertisement
11/11
पण, तुमचं बीपी अगोदरच कमी असेल किंवा बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी तुम्ही औषधं घेत असाल तर नारळपाण्यामुळे बीपी खूप कमी होऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळपाणी पिऊ नये; जाणून घ्या सविस्तर माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल