Vidarbha Alert: एप्रिलअखेर नवं संकट, विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेचा पारा चढलेला असतानाच एप्रिलअखेर नवं संकट येणार आहे. हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

विदर्भातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याबरोबरच वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज 27 एप्रिलला विदर्भातील तापमान आणि हवामान कसे राहील? ते जाणून घेऊ.
advertisement
2/7
आज 27 एप्रिलला नागपूरमध्ये किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असून, कमाल तापमान 40 अंशांच्या आसपास राहील. अमरावतीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं. वर्धा जिल्ह्यांत 40 अंश सेल्सिअस कमाल तापमान असू शकतं.
advertisement
3/7
गोंदियात 38 अंश, बुलढाण्यात 39 अंश तर चंद्रपूरमध्येही 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
विदर्भातील बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/7
या हवामान बदलाचा थेट परिणाम विदर्भातील शेतीवर होण्याची शक्यता आहे. गहू, फळबाग यांसारख्या पिकांवर वादळी वाऱ्यांमुळे नुकसान होऊ शकते. तसेच गारपीटीमुळे पिकांची क्वालिटी घसरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास काढणी झालेली पिके सुरक्षित स्थळी ठेवावीत तसेच न कापलेली पिके तातडीने काढण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
6/7
विजेच्या गडगडाटासोबत वादळी वाऱ्यांमुळे झाडे, विजेच्या तारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वीज गडगडताना मोबाईल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा.
advertisement
7/7
विदर्भात पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होणार असून, वातावरणात आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. यासोबतच काही भागांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Alert: एप्रिलअखेर नवं संकट, विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट, आजचा हवामान अंदाज