TRENDING:

सांगलीकरांची कल्पनाच भारी! स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना, झाडांतून जपल्या स्मृती!

Last Updated:
Sangli History: भारतीय स्वातंत्र्यवीरांना सांगलीत अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. क्रांती स्मृती वनाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती झाडांच्या माध्यमातून जपण्यात आल्या आहेत.
advertisement
1/9
ही कल्पनाच भारी! स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना, झाडांतून जपल्या स्मृती!
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतींचा आदर करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी स्मारके आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी गावात जिवंत स्मारक उभारण्यात आलंय. इथं थोर हुतात्म्यांच्या स्मृती झाडांच्या रूपात जपल्या जात आहेत. या ठिकाणाला ‘क्रांती स्मृतीवन’ म्हणून ओळखलं जातंय.
advertisement
2/9
स्वातंत्र्यलढ्याच्या वीरांनी दिलेल्या प्रेरणेचा आदर करून ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, हा क्रांती स्मृतीवन निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. बलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांनी येरळा नदीकाठावरील स्वतःच्या 5 एकर जागेत 20 वर्षांपूर्वी हे स्मृतीवन उभारले आहे. क्रांती स्मृतीवन या नावामागील इतिहास आणि उद्देश जाणून घेण्यासाठी लोकल18ने भाई संपतराव पवार यांच्याशी संवाद साधला.
advertisement
3/9
“सन 1942 मध्ये महात्मा गांधींनी ‘करेंगे या मरेंगे’ अशी घोषणा दिली आणि तिथूनच स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी पर्व सुरू झाले. या सुवर्ण पर्वाचा सुवर्ण महोत्सव 1992 साली साजरा करण्यात आला. मात्र, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला इस्लामपूर, शिराळा आणि कागलमध्ये एकतर्फी प्रेमातून घडलेल्या हत्यांच्या घटनांनी तरुण पिढीची चिंता वाढवली. त्यामुळे इतिहास जागृत करण्याचा निर्णय घेतला,” अंस पवार सांगतात.
advertisement
4/9
“वाळवा हे 1942 च्या चळवळीचे प्रमुख केंद्र होते, तेव्हा येथील तरुण स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे होते. या पार्श्वभूमीवर तरुणांना देशासाठी प्रेरणा देण्यासाठी ‘क्रांती स्मृतीवन महाराष्ट्र व्यासपीठ’ तयार करण्यात आले. क्रांतिकारकांच्या नावाने एक-एक वृक्ष लावून त्यांची स्मृती जागवली जाते,” असे संपत पवार सांगतात.
advertisement
5/9
स्मृतीवनाच्या सुरुवातीला थोर मातांच्या स्मृती वृक्षांचे ‘विसावा केंद्र’ आहे, जेथे थोरवीरांच्या स्मृती जपल्या जातात. याठिकाणी व्हिजन सेंटर, स्मृती खांब, विचारमंच, आणि स्मृती पॅगोडा यांची स्थापना करण्यात आली आहे.
advertisement
6/9
क्रांती स्मृतीवनात प्रत्येक हुतात्म्याच्या नावाने एक झाड लावण्यात आले असून त्यास क्यूआर कोड दिला आहे. या कोडद्वारे वीरांची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजीत मिळते. या उपक्रमात ‘वन, पर्यावरण आणि सामाजिक संतुलन’ या त्रिसूत्रीच्या आधारावर युवकांना बांधून ठेवण्यासाठी प्रबोधन केंद्र उभारले जात आहे. सांगलीपासून
advertisement
7/9
स्थानिक पत्रकार दीपक पवार यांच्या मते, या क्रांतीवनात सध्या इन्स्पिरेशन सेंटर उभारले जात आहे. बदलता भारत युवा पिढीला समजण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून हे स्मृतीवन आकारास आले आहे.
advertisement
8/9
प्रत्येक झाडासोबत यंदाच्या पावसाळ्यात एक फुलवेल लावण्यात आली असून ती बहरल्यावर निसर्गही क्रांतिकारकांच्या स्मृतींना फुले वाहील, असा सामाजिक कार्यकर्ते भाई पवार यांचा विश्वास आहे.
advertisement
9/9
45 किलोमीटर आणि विटा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रांती स्मृतीवनला भेट देणे, ही देशभक्तीची प्रेरणादायी अनुभूती ठरेल. (प्रीती निकम, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सांगली/
सांगलीकरांची कल्पनाच भारी! स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना, झाडांतून जपल्या स्मृती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल