भरतीसाठी उमेदवार मैदानात प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदवलेल्या माहितीशी त्वरित जुळवला जाणार आहे. चेहरा ओळख प्रणालीमुळे डमी उमेदवार उभा करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास प्रणाली तत्काळ इशारा देईल. तसेच छातीची मोजणी करताना उमेदवार मैदानाबाहेर गेला आणि परत आला, तर तोच उमेदवार आहे की नाही, याची खात्रीही एआय प्रणालीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे मध्यंतरी उमेदवार बदलण्याची शक्यता पूर्णपणे बंद होणार आहे.
advertisement
पुन्हा डोकं वर काढतोय महारोग, पुणे विभागातून धडकी भरवणारी आकडेवारी समोर
धाव चाचणीदरम्यान वेळेची हेराफेरी टाळण्यासाठी धावपट्टीवर विशेष सेन्सर बसवले जाणार आहेत. उमेदवाराने धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेला अचूक वेळ थेट संगणकीय प्रणालीत नोंदवला जाईल. यामुळे मानवी चूक किंवा जाणूनबुजून केलेली गडबड टाळता येणार असून, सर्व उमेदवारांना समान व न्याय्य संधी मिळणार आहे.
यंदाच्या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलिस शिपाईच्या 1 हजार 833 पदांसाठी तब्बल 86 हजार 240 अर्ज आले आहेत. वाहनचालकाच्या 103 पदांसाठी 42 हजार 896 अर्ज, तर कारागृह शिपाईच्या 130 पदांसाठी 20 हजार 791 अर्ज दाखल झाले आहेत. एआयच्या वापरामुळे फसवणूक करणाऱ्यांचा मार्ग बंद होईल आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेल, असा ठाम विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.






