काय सांगतात अभयासक ?
नवरात्रीत अनेकजण अनवाणी पायाने चालतात. ही पद्धत पूर्वीच्या काळापासून चालत असलेली दिसते. पूर्वीच्या काळात पादत्राणे किंवा जोडे हे चामड्यापासून बनवले जायचे. म्हणजेच एखाद्या प्राण्याची हत्या करून चप्पल तयार व्हायच्या. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवस तरी आपण चप्पल न घालून प्राण्यांची हिंसा किंवा हत्या थांबविण्यासाठी, प्राण्याला न मारण्यासाठी एकप्रकारे मदत करू शकतो. हा अनवाणी चालण्याचा उद्देश असू शकतो, असे भूषण सांगतात.
advertisement
शारदीय नवरात्र म्हणजे काय? कसे असते नवरात्रीतील उपवासाचे व्रत ?
हाही असू शकतो तर्क
तसेच आपलं शरीर हे विविध चक्र आणि ऊर्जा यांच्यापासून तयार झालं आहे. पायांशी संबंधित स्वाधिष्टीन आणि मुलाधार चक्र असतात. पायांचा संपर्क हा मातीशी आणि पृथ्वीच्या घटकांशी असतो. जेव्हा अनवाणी पायाने चालतो तेव्हा या दोन चक्राचा संबंध मातीच्या उर्जेशी येतो. त्यामुळे नवरात्रीतच्या नऊ दिवस आपली मातीशी नाळ कायम राहावी. पृथ्वीशी आपला संपर्क यावा, मातीचा स्पर्श व्हावा, हा त्यामागचा उद्देश असू शकतो, असंही ज्योतिर्वेद भूषण म्हणतात.
नवरात्रीमध्ये का करतात कन्या पूजन ? काय आहे पौराणिक महत्त्व?
नवरात्रीत भरा देवीची ओटी
नवरात्री हा सगळीकडे नवचैतन्य निर्माण करणारा एक सण आहे. नवरात्रीतील नऊ दिवस आई जगदंबेची उपासना केली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस देखील बोलला जातो. ठिकठिकाणी देवीआईची आराधना केली जाते. त्यातीलच एक म्हणजे अनवाणी पायाने चालणे. मात्र देवीआईला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवस कन्यापूजन करण्याचा सल्ला अभ्यासक देतात. तसेच या दिवसांत देवीची ओटी भरून तिची आराधना केल्यास देवी प्रसन्न होते, असेही सांगितले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)