\r\nछ.संभाजीनगर: पाणी ओसरलं पण जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. पूर आल्यामुळे लोक अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले जिथे जागा मिळेल तिथे तंबू ठोकून राहिले पण पाणी कमी आल्यानंतर अनेक शेतकरी बेघर झालेले आहेत. संसार उघड्यावर पडला आहे. शेती, जनावरं वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे