TRENDING:

Mumbai: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, बोरिवलीमध्ये दुकानांना आग, घटनास्थळाचा VIDEO

(विजय वंजारा, प्रतिनिधी) मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. बोरिवली पश्चिम येथील गणपत पाटील नगर, स्ट्रीट नंबर ७ आणि ८ दरम्यान असलेल्या भंगार दुकानात भीषण आग लागली. भंगार दुकान जळून खाक झालं आहे. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण कळू शकलेले नाही. या आगीमुळे आठ ते दहा दुकानं जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम करत आहेत.

Last Updated: November 22, 2025, 18:13 IST
Advertisement

Health Tips : शरीरावर पांढरे डाग आहेत? घाबरुन जाऊ नका; अशी घ्या काळजी

छत्रपती संभाजीनगर : काही लोकांच्या शरीरावरती पांढरे डाग असतात त्याला काहीजण कोड असे देखील म्हणतात. मात्र, या पांढऱ्या डागांविषयी लोकांचा मनामध्ये अनेक गैरसमज असतात. ज्या व्यक्तीला पांढरे डाग आहेत अशा व्यक्तींना जर आपण स्पर्श केला तर ते देखील आपल्याला होतात असा लोकांचा गैरसमज असतो. तसंच यावरती काही उपचार नाहीत असं काही लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळे याबद्दच छत्रपती संभाजीनगरमधील कॉस्मेटिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी माहिती दिलेली आहे.

Last Updated: November 21, 2025, 18:59 IST

रोज 'खजूर' खाल्ल्याने कॅन्सर-डायबेटिसचा धोका कमी होतो? डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती...

खजूर हे एक सुपरफूड आहे, जे चवीसोबतच आरोग्याचा खजिना आहे. त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. रोज खजूर खाल्ल्याने केवळ ऊर्जाच मिळत नाही, तर पचनक्रिया मजबूत होण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार, खजूर अल्झायमर, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी करू शकतो. चला, तर रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे आणि ते आहारात समाविष्ट करण्याचे योग्य मार्ग जाणून घेऊया...

Last Updated: November 21, 2025, 18:36 IST
Advertisement

Road Safety: अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे नेमकं काय? कसा वाचू शकतो जखमींचा जीव?

मुंबई : अपघात हा शब्दच प्रचंड धडकी भरवणारा आहे. पण तुम्हाला माहितीये का, अपघातानंतरचा काही काळ हा 'गोल्डन अवर' म्हणून ओळखला जातो. हा गोल्डन अवर म्हणजे नेमकं काय, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 21, 2025, 18:12 IST

Success Story : अपघातात हात–पायांना गंभीर दुखापत, पण हार नाही मानली, व्हीलचेअरवरून सुजय यांनी उभारली 2 कोटींची कंपनी

पुणे

पुणे: सलग दोन ते तीन स्टार्टअपमध्ये अपयश येऊन सुद्धा हार न मानता, पुण्यातील सुजय पाचंगे यांनी तब्बल दोन कोटींची कंपनी उभारली आहे. सुजय पाचंगे यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. वयाच्या 21व्या वर्षी झालेल्या अपघातात त्यांच्या दोन्ही हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.

Last Updated: November 21, 2025, 17:36 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Mumbai: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, बोरिवलीमध्ये दुकानांना आग, घटनास्थळाचा VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल