
पुणे : ऊसतोड कामगाराच्या मुलाची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. बीडच्या गांधनवाडी येथील शंकर इथापे याचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून ऊसतोडणीचं काम करत आहे. बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शंकरचं कुटुंब गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.