Aai Kuthe kay Karte : 'ती माझ्या मनातून उतरली...', संजना-अरुंधतीमध्ये कडाक्याचं भांडण, काय घडणार आजच्या भागात?

Last Updated:

अरुंधती यावेळीही यशाच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. यशाच्या निर्णयाला तिचा सपोर्ट आहे.

संजना-अरुंधतीमध्ये कडाक्याचं भांडण
संजना-अरुंधतीमध्ये कडाक्याचं भांडण
मुंबई : आई कुठे काय करते या मालिकेचं कथानक सध्या यश, आरोही आणि गौरी यांच्याभोवती फिरत आहे. मालिकेत गौरी यशच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर यश मुव्ह ऑन झाला आणि त्यानं आरोहीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असताना मात्र मध्येच गौरीची एंट्री झाली. अरुंधती यावेळीही यशाच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. यशाच्या निर्णयाला तिचा सपोर्ट आहे. पण या सगळ्यात आता अरुंधती आणि संजना यांच्यात नात्यात दुरावा निर्माण होणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात गौरी भारतात येणार आहे. भारतात आल्यानंतर की यशला भेटते. यशला भेटल्यानंतर गौरी आत्महत्येचा प्रयत्न करते असं दाखवण्यात आलं आहे. संजना गौरीला भेटण्यासाठी जाते आणि ती जीव देत असल्याचं पाहते. हे सगळं येऊन ती देशमुखांच्या घरी सांगते. यानंतर गौरीला यशला सोडल्याचा पश्चाताप होत आहे असं सर्वानं वाटतं. पण यश मात्र आरोहिशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगतो.
advertisement
यशला निर्णयाला अरुंधती सपोर्ट करते. यश तू आरोहीशीच लग्न कर असं अरुंधती सांगते. अरुंधतीचा हा निर्णय संजनाला मात्र पटत नाही. घरात सर्वांसमोर आणि खास करून आशुतोषसमोर संजना अरुंधतीला खडे बोल सुनावते. या सगळ्याप्रकारानंतर अरुंधतीची काळजी आणखी वाढते. कारण एकीकडे मनु आणि माया टिचरमुळे सगळे काळजीत आहेत. आशुतोष आणि अरुंधती यांच्यात तणाव निर्माण झालेत.
advertisement
या परिस्थितीमध्ये आशुतोष अरुंधतीची साथ देतो. संजना आज जरी रागात बोलली असली तरी तिनं तुझ्यावर फार गंभीर आरोप केलेत. तुझ्याबद्दल वाईट बोललेलं मी सहन करू शकत नाही. मी ते खपवूनच घेऊ शकत नाही. मी हे सगळं करणारच आहे पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त यशला सांभाळ, असं आशुतोष अरुंधतीला सांगतो.
advertisement
advertisement
देशमुखांच्या घरी मात्र संजनाचा पारा चांगलाच चढलेला असतो. संजना आप्पांना सांगते, "अरुंधतीनेच यशला सांगितलं आहे की गौरीचा विचार करू नको. माझ्या मनातून अरुंधती आज कायमची उतरली. यापुढे मी तिच्याशी कधीच चांगलं नाही वागू शकणार."
जेव्हा संजना आणि अरुंधती या एकाच घरात राहत होत्या तेव्हा त्या नेहमी एकमेकींना सपोर्ट करताना दिसल्या. मात्र दोघींमध्ये अचानक इतकी कटूता निर्माण झालेली पाहून प्रेक्षकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe kay Karte : 'ती माझ्या मनातून उतरली...', संजना-अरुंधतीमध्ये कडाक्याचं भांडण, काय घडणार आजच्या भागात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement