बापरे! 30 लाख मुलांचा मृत्यू, औषधाचाही होत नाही परिणाम, कारण काय?

Last Updated:

Child death : जगात दरवर्षी 30 लाख मुलांचा मृत्यू होतो. जगातील लोकसंख्येसमोरील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी हे एक मानलं गेलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली : एखाद्या आजाराची महासाथ आली की त्यात शेकडो, लाखो बळी जातात. कोरोनामध्ये तुम्ही ही स्थिती पाहिली आहे. पण आता चक्क 30 लाख मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलांच्या आरोग्यावरील दोन आघाडीच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती मिळाली.
जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवालाच्या लेखकांनी असा अंदाज लावला आहे की 2022 मध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्गामुळे 30 लाखांहून अधिक मुले मृत्युमुखी पडतील. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की गेल्या तीन वर्षांतच मुलांमध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित संसर्ग दहा पटीने वाढला आहे. कोविड साथीच्या आजाराच्या परिणामामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली असेल.
advertisement
अँटिबायोटिक्सचाही परिणाम नाही
यातील बहुतेक मुलं आफ्रिका आणि आग्नेय आशियातील होती. ही मुलं प्रामुख्याने संसर्गाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होती. पण अँटीबायोटिक्सने काम करणं थांबवलं, ज्यामुळे इतक्या मुलांचा मृत्यू झाला. जेव्हा संसर्ग निर्माण करणारे सूक्ष्मजीव अशा प्रकारे बदलतात की सामान्य प्रतिजैविके त्यांच्याविरुद्ध काम करत नाहीत तेव्हा प्रतिजैविक प्रतिकार विकसित होतो. जगातील लोकसंख्येसमोरील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी हे एक मानलं गेलं आहे.
advertisement
अँटिबायोटिक्सचा अतिवापर
प्रतिजैविकांच्या अकार्यक्षमतेचे सर्वात मोठं कारण म्हणजे या औषधांचा अनावश्यक वापर. त्वचेच्या संसर्गापासून ते न्यूमोनियापर्यंत विविध प्रकारचे जिवाणू संसर्ग बरे करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. कधीकधी ते खबरदारी म्हणून देखील दिले जातात, जसे की ऑपरेशनपूर्वी किंवा कर्करोगाच्या उपचारादरम्यान. परंतु सर्दी, फ्लू किंवा कोविड सारख्या विषाणूजन्य आजारांवर अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. अतिरेकी आणि अयोग्य वापरामुळे काही जीवाणूंमध्ये औषध-प्रतिरोधकता विकसित झाली आहे, तर नवीन प्रतिजैविकांचा विकास खूपच मंद आणि महागडा झाला आहे. याचा अर्थ असा की आपण अशा अनेक आजारांसाठी अँटीबायोटिक्स घेतो जिथं त्यांची आवश्यकता नसते. या परिस्थितीत, हे औषध हळूहळू कुचकामी ठरते.
advertisement
या अहवालाचे प्रमुख लेखक डॉ. यानहोंग जेसिका हू आणि प्राध्यापक हर्ब हार्वेल यांनी सांगितलं की, गंभीर संसर्गासाठी राखीव असलेल्या औषधांच्या वापरातही चिंताजनक वाढ झाली आहे. 2019 ते 2021 दरम्यान, आग्नेय आशियामध्ये वॉच अँटीबायोटिक्सचा वापर (ज्यांना प्रतिकार होण्याचा धोका जास्त असतो) 160 टक्क्यांनी आणि आफ्रिकेत 126 टक्क्यांनी वाढला. याच काळात आग्नेय आशियामध्ये राखीव अँटीबायोटिक्सचा (बहु-प्रतिरोधक संसर्गांसाठी शेवटचा उपाय असलेली औषधं) वापर 45 टक्क्यांनी आणि आफ्रिकेत 125 टक्क्यांनी वाढला.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बापरे! 30 लाख मुलांचा मृत्यू, औषधाचाही होत नाही परिणाम, कारण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement