लग्न कधी करावं? योग्य वय काय? सिंगल लोकांसाठी डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
लग्नाचे योग्य वय काय, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तज्ज्ञांच्या मते, 21 ते 30 वर्षे महिलांसाठी आणि 25 ते 33 वर्षे पुरुषांसाठी योग्य वय मानले जाते. मात्र, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी अधिक...
लग्नसराई सुरू झाली की, सिंगल मुला-मुलींना लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. हे अनेकदा त्यांना त्रासदायक वाटतं. लग्न हा आयुष्यातील खूप मोठा निर्णय आहे, जो विचारपूर्वक घ्यायला हवा. हे फक्त दोन लोकांच्याच नव्हे, तर दोन कुटुंबांच्या आयुष्याशी संबंधित आहे. अनेकदा लोक विचारतात की लग्नासाठी योग्य वय काय असावं? काही लोक 25 वर्षं योग्य मानतात, तर काही 30 वर्षं. खरंच लग्नासाठी योग्य किंवा अयोग्य वय असतं का? सिंगल लोकांनी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच जाणून घ्यायला हवं.
डॉक्टर सोनाली गुप्ता काय सांगतात?
गायनेक केअर क्लिनिकच्या संचालक डॉ. सोनाली गुप्ता न्यूज18 ला सांगतात की, लग्नासाठी कोणतंही 'परफेक्ट' वय नसतं. लग्नाचं वय हे सगळ्यांसाठी एकसारखं नसतं. जेव्हा तुम्ही मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असाल, तेव्हा ते लग्नासाठी योग्य वय मानलं जातं. लग्नाचा निर्णय घाईघाईत न घेता, योग्य वेळी आणि योग्य जोडीदारासोबत घ्यायला हवा. मात्र, लग्नाचा निर्णय खूप लांबवूही नये. योग्य वेळी लग्न केल्याने फॅमिली प्लॅनिंग सोपं होतं.
advertisement
योग्य वयात लग्न करण्याचे फायदे काय?
डॉ. सोनाली सांगतात की, पुरुष आणि स्त्रियांसाठी लग्नाचं आदर्श वय वेगवेगळं असू शकतं, पण निरोगी, आनंदी आणि स्थिर आयुष्यासाठी योग्य वेळी लग्न करणं खूप महत्त्वाचं आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, स्त्रियांसाठी 21 ते 30 वर्षं आणि पुरुषांसाठी 25 ते 33 वर्षं लग्नासाठी सर्वोत्तम मानली जातात. या वयात शरीर प्रजननक्षमतेच्या शिखरावर असतं आणि लोक मानसिकदृष्ट्या परिपक्व होतात. बहुतेक लोकांनी या वयापर्यंत करिअरबद्दलचे निर्णयही घेतलेले असतात. योग्य वयात लग्न केल्याने नॉर्मल गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते आणि गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. यामुळे फॅमिली प्लॅनिंगमध्ये मदत होते. 21 ते 30 वर्षांचं वय सर्वात फिट आणि हेल्दी असतं.
advertisement
लग्न लांबवण्याचा विचार असेल तर काय करावं?
आयव्हीएफ तज्ज्ञांच्या मते, लग्न वेळेवर व्हायला हवं, पण 30 वर्षांपर्यंतही अनेक लोक लग्नासाठी तयार नसतात. जर एखाद्या व्यक्तीला 30 वर्षांनंतर लग्न करायचं असेल, तर त्यांनी एग किंवा स्पर्म फ्रीझिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे त्यांना जास्त वयात मूल न होण्याची समस्या टाळता येते. 30 वर्षांनंतर पुरुष आणि स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. यामुळे अनेक जोडप्यांचं पालक होण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, आजकाल आयव्हीएफसह अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्यांचा अवलंब करता येतो.
advertisement
हे ही वाचा : सतत पोट दुखतंय, 'हा' गंभीर आजार तर झाला नाही ना? डाॅक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपचार!
हे ही वाचा : भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढलं, 5 पैकी 3 जणांचा मृत्यू! 2050 पर्यंत वाढणार 'इतकं' प्रमाण!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
लग्न कधी करावं? योग्य वय काय? सिंगल लोकांसाठी डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती!