छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - हे शहर ऐतिहासिक असून, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांसारख्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

या सर्व शंकांचे निरसन करताना उज्ज्वल निकम यांनी मत मांडले आहे.ते म्हणाले, "अजितदादांच्या विमानात सहा प्रवासी होते, असे दर्शवणारा कोणताही अधिकृत पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही. अपघाताच्या वेळी विमानात इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन होते की, आगीमुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. अशा गंभीर परिस्थितीत विनाकारण संशय निर्माण करून घटनेला वेगळं वळण देणं चुकीचं आहे."






छत्रपती संभाजीनगरला (चिकलठाणा विमानतळ) मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि पुण्याहून नियमित विमानसेवा आहे. विमानतळावरून शहरात जाण्यासाठी टॅक्सी आणि बसची सोय आहे.
शहरात फिरण्यासाठी रिक्षा, सायकल-रिक्षा, शहर बस आणि कॅबचा वापर केला जातो.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन मुंबई, पुणे, हैदराबाद, मनमाड आणि नागपूरला जोडलेले आहे. 'देवगिरी एक्सप्रेस' आणि 'अजिंठा एक्सप्रेस' सारख्या गाड्या इथे येण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पुण्याहून सुमारे 330 किलोमीटर आणि मुंबईहून सुमारे ३७० किलोमीटरवर हे शहर आहे. पुणे आणि मुंबईहून NH 52 आणि NH 160 ने इथे पोहोचता येते. 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या' (MSRTC) आणि खासगी बसेस महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून इथे नेहमी येतात-जातात.



