'ते' पुन्हा आले पण हाफ होऊन आले; जळगावच्या सभेत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

Last Updated:

जळगावमध्ये सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
जळगाव, 10 सप्टेंबर, लक्ष्मण घाटोळ : आज जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील खोचक टोला लगावला आहे. ते पुन्हा आले पण हाफ होऊन आले असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. . केंद्र सरकारच्या एक देश एक नाव या भूमिकेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नशीब भारत तरी म्हणताय, नाहीतर स्वतःचे नाव देतात की काय असं वाटलं होतं असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. जेव्हा तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात लावला तेव्हाच मी ठरवलं तुम्हाला सोडणार नाही. पूर्वी आले देवाजीच्या मना असे होते, आता आले मोदींच्या मना लगेच अधिवेशन बोलावलं असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
advertisement
पोस्टरवरून निशाणा  
दरम्यान एक सप्टेंबरला मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टवरून देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बॅनर लावले, हो कधीच होऊ देणार नाही. मात्र आपण पण मग उत्तर दिलं, कमळाबाईची पालखी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'ते' पुन्हा आले पण हाफ होऊन आले; जळगावच्या सभेत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement