Manoj Jarange : मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!

Last Updated:

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचं गणित बिघडवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
मुंबई : मनोज जरांगेंनी आपला मोर्चा आता थेट निवडणुकीकडेच वळवल्याचं दिसतंय. यंदाच्या लोकसभेला जरांगे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता तर आहेच, मात्र त्यासोबतच राज्यभरात प्रत्येक लोकसभेच्या जागेवर हजारो मराठा उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. खुद्द जरांगेंनीच या गोष्टीला हवा दिली आहे. आता हजारो उमेदवार जर निवडणुकीच्या रिंगणात आले, तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागू शकते. यामुळे निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढेल. हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच तर निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर होतील का? असा सवालही पुढे येतोय.
मनोज जरांगेंच्या मनात काय?
प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 उमेदवार उभे करायचे
तालुक्यातून 250 हून अधिक उमेदवार उभे राहणार
प्रत्येक जिल्ह्यात एक हजारहून अधिक उमेदवार
ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही डिपॉझिट भरायचं
ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत, त्यांच्यासाठी गावाने पैसे जमा करायचे
उमेदवार वाढले तर काय होणार?
जिथे आधी एका जागेवर 15 ते 16 उमेदवार दिसायचे तिथे हजार उमेदवार दिसतील
advertisement
निवडणूक आयोगाला तितकीच चिन्हही वाटावी लागतील
तितक्याच पटीत ईव्हीएमची संख्याही वाढवावी लागेल
ईव्हीएम वाढली तर मतदान करताना अधिकचा वेळ लागणार
मतदारांमध्ये चिन्ह आणि उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण होईल
एका ईव्हीएम बॅलट युनिटवर 16 उमेदवार असू शकतात
त्याहून अधिक उमेदवार झाल्यास 16 च्या पटीनुसार मशीन वाढवावी लागणार
सध्या ईव्हीएमचं तिसरं व्हर्जन त्यात 24 बॅलटिंग युनिट वाढवता येतात
advertisement
एका केंद्रात 384 उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं
त्याहून अधिक उमेदवार वाढवण्याची सोय सध्याच्या सिस्टीममध्ये नाही
काय म्हणाले माजी सहनिवडणूक आयुक्त?
अशा प्रकारे उमेदवारांची संख्या वाढली आणि ती 300 पेक्षा जास्त झाली तर ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेणंही निवडणूक आयोगासाठी कठीण होईल, असं मत माजी सह निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी व्यक्त केलं.
advertisement
'32 वा उमेदवार आला तर तिसरं बॅलट होईल. 48 वा उमेदवार आला तर चौथं बॅलट होईल, त्यामुळे आपल्याला बॅलट युनिट्स वाढवावी लागतील. बॅलट युनिट्स वाढवणं अशक्य नाही, पण प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचं होऊ शकतं,' असं शिरीष मोहोड म्हणाले.
नितेश राणेंची टीका
दरम्यान निवडणुका लढवण्याच्या जरांगेंच्या भूमिकेवर नितेश राणेंनी टीका केली आहे. 'मनोज जरांगेंना मराठा समाजही गांभिर्याने घेत नाही. मराठा समाजामध्येही त्यांचा फार विरोध व्हायला लागला आहे, कारण जरांगे आता मराठा समाजाबद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागले आहेत. जरांगे काय बोलतात याकडे जास्त लक्ष देत नाही', असं जरांगे म्हणाले.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : मनोज जरांगे बिघडवणार EVM चं गणित? निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढणार!
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement