देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी नदीजोड प्रकल्प काय आहे? दुष्काळाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होईल!

Last Updated:

Nadi Jod Prakalp For Marathwada: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबरोबर नदी जोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आपला इरादा बोलून दाखवला. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पाणी प्रश्न आणि दुष्काळमुक्ती नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.शपथ घेतल्या घेतल्या फडणवीस यांनी नद्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
मराठवाडा आणि दुष्काळ नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु फडणवीस यांच्या घोषणेने आता मराठवाडा दुष्काळाच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणे हा त्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी त्यांनी ६४ कोटींचा निधी आधीच मंजूर केला आहे.काल शपथ घेतल्या घेतल्या त्यांनी नदी जोड प्रकल्पाबाबत आपला इरादा बोलून दाखवला. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे.
advertisement

या प्रकल्पाची रचना नेमकी कशी असेल?

-कोकणातील उल्हास आणि वैनगंगा खोऱ्यातील पाणी समुद्रामध्ये जाते
-समुद्रात जाणारे पाणी धरण बांधून साठवले जाईल
-साठवलेले 55 टीएमसी पाणी उचलून वैनगंगा मध्ये सोडणे
-वैनगंगा मधून हे पाणी मुकणे धरणाच्या माध्यमातून गोदावरी पात्रात सोडले जाईल
-गोदावरी पात्रातून पाणी मराठवाड्यात आणले जाईल
-योजना केवळ 55 टीएमसी पाण्याची
advertisement
-उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी धरण बंधने साठी एक टीएमसी पाण्यासाठी एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित
-त्यामुळे 55 टीएमसी पाण्यासाठी 55 हजार कोटींचा खर्च
-अडवलेले पाणी जवळपास 650 मीटर वर उचलावे लागेल
-किंवा डोंगरातून बोगदा खोदून पाणी आणावे लागणार
कोकणातून पाणी मराठवाड्यात आणणे साठी योजना आहे मात्र पाणी नाशिक जिल्ह्यातून आणावे लागणार आहे..नाशिक आणि मराठवाडा पाणी संघर्ष बघता पाणी सहज येईल असे म्हणता येणार नाही..कारण नाशिक जिल्ह्यातील काही भागांना midc साठी 55 टीएमसी पैकी पाणी पाहिजे आहे. त्यामुळे मराठवाडा विरुद्ध नाशिक असा वाद पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही..मात्र देवेंद्र फडणवीस यांची इच्छा शक्ती पाहत सर्व अडचणींवर मात केल्या जाईल अशी अपेक्षा मराठवाड्याला दिसते आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी नदीजोड प्रकल्प काय आहे? दुष्काळाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होईल!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement