'मी जरी शिंदे, फडणवीसांसोबत असलो तरी...', अजितदादा स्पष्टच बोलले

Last Updated:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते मोहोळमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये बोलत होते.

News18
News18
सोलापूर, प्रीतम, पंडित : मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलतान पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. काहीजण माझ्यावर टीका करतात त्याचं मला काही घेणं देणं नाही. लोकांशी प्रामाणिक राहायचं लबाडी करायची नाही. स्पष्ट बोलतो त्यामुळे लोक नाराज होतात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मोहोळमधील तमाम माझ्या महिला भगिनींचं आणि नागरिकांचे मी स्वागत करतो. आमदार यशवंत माने, राजन पाटील यांचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला शब्द देतो यापुढे तुम्हाला निधीचा कमतरता भासू देणार नाही.
मिळालेल्या सत्तेचा वापर या भागातील विकास कसा करता येईल? यासाठी करा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की काहीजण माझ्यावर टीका करतात त्याचं मला काही घेणं देणं नाही. लोकांशी प्रामाणिक राहायचं लबाडी करायची नाही. स्पष्ट बोलतो त्यामुळे लोक नाराज होतात. महापुरुषांनी राज्याला एक दिशा देण्याचं काम केलं आहे. अनेक जण विचारतात या सरकारमध्ये तुम्ही कसं गेलात मी विकास करण्यासाठी या सरकारमध्ये आलो आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना आम्ही आमची विचारसरणी सोडली नाही. त्यावेळेस आम्ही शिवसैनिकांसोबत होतो. आता जरी शिंदे आणि फडणवीसांसोबत असलो तरी आमचा विचार सेक्युरवादीच आहे.
कुठलाही जात धर्म एकमेकांचा अनादर करत नाही, पण आज  विषारी प्रकारची भाषा वापरली जात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
'मी जरी शिंदे, फडणवीसांसोबत असलो तरी...', अजितदादा स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement