नजर हटी, दुर्घटना घटी! महाराष्ट्रातले 10 धोकादायक घाट, एक तर जीवघेणा ब्लॅक स्पॉट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ताम्हिणी घाटात थार अपघातात ६ मित्रांचा मृत्यू, महाराष्ट्रातील वरंधा, अणुस्कुरा, खंबाटकी, परशुराम, आंबेनळी, रघुवीर, तिलारी घाट धोकादायक मानले जातात.
मुंबई: ताम्हिणी घाटात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. थार घेऊन जीवलग मित्र निघाले त्यांचा भीषण अपघात झाला. रेलिंग तोडून थार 500 फूट खोल दरीत कोसळली. धुकं आणि गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. 6 मित्र हे 18 ते 24 वयोगटातील होते. या दुर्देवी घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात ६ जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातील धोकादायक घाट कोणते हा चर्चेचा विषय बनला आहे. आज आपण त्या बद्दल जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक असून, येथील ३० हून अधिक घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून कोकण किनारपट्टीला दख्खनच्या पठाराशी जोडतात. धुकं आणि पावसात हे घाट निसर्गाच्या सौंदर्याचं अद्भुत दर्शन घडवत असले तरी, या मार्गांवरून प्रवास करणे म्हणजे प्रत्येक पावलावर मोठी जोखीम पत्करणे आहे. खड्डे, अत्यंत धोकादायक वळणं आणि भूस्खलन, दरड कोसळणे यामुळे या घाटांनी अनेक निष्पाप प्रवाशांचे जीव घेतले आहेत. हे घाट प्रवासासाठी धोकादायक का आहेत, यावर एक नजर टाकूया.
advertisement
खतरनाक वळणं आणि अरुंद रस्ते- महाराष्ट्रातील अनेक घाट अरुंद रस्ते आणि तीव्र वळणांमुळे प्रवासासाठी अत्यंत धोकादायक ठरतात
1. वरंधा घाट - पुणे-रायगड: पुणे आणि महाड यांना जोडणारा हा घाट तीव्र वळणे आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचा मोठा धोका निर्माण करतो. पावसाळा आणि हिवाळ्यात धुक्याचे साम्राज्य असल्याने दृश्यमानता कमी होते.
2. अणुस्कुरा घाट- रत्नागिरी-कोल्हापूर: हा घाट अरुंद असून त्याची वळणे अतिशय तीव्र आहेत आणि एका बाजूला थेट खोल दरी आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी पुरेशी दिवे व्यवस्था नसल्याने अपघातांची शक्यता वाढते.
advertisement
3. खंबाटकी घाट- पुणे-बंगळूर महामार्ग: हा महत्त्वाचा घाट त्याच्या धोकादायक 'S' आकाराच्या वळणांमुळे ओळखला जातो. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा 'ब्लॅक स्पॉट' म्हणूनही ओळखला जातो, विशेषतः पुणे-सातारावरून कोकणात जाण्यासाठी हाच मार्ग वापरावा लागतो.
भूस्खलन आणि दरीचा धोका- पावसाळ्यात दरड कोसळण्याची समस्या अनेक घाटांवर जीवघेणी ठरते. खोल दरी आणि कमकुवत संरक्षण भिंती यामुळे धोका आणखी वाढतो असे कोणते घाट आहे ते जाणून घेऊया.
4. परशुराम घाट -मुंबई-गोवा महामार्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या घाटात पावसाळ्यात सतत दरड कोसळत असते, ज्यामुळे वाहतूक थांबते आणि रस्ता खचतो. हा धोका येथे वर्षभर कायम असतो.
advertisement
5. आंबेनळी घाट- रायगड : या घाटाची रचना सर्वात लांब आणि धोकादायक मानली जाते. येथेही दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात.
6. रघुवीर घाट - सातारा-रत्नागिरी: या घाटाच्या कडेला खोल दरी असून, अनेक ठिकाणी संरक्षक भिंती नाहीत. पावसाळ्यात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असला तरी, हा प्रवास अत्यंत धोकादायक असतो.
7. तिलारी घाट- सिंधुदुर्ग-कोल्हापूर-गोवा : पावसाळ्यात हा घाट सर्वात जास्त धोक्याचा मानला जातो कारण या काळात भूस्खलनाचा धोका अधिक असतो.
advertisement
धुकं आणि नैसर्गिक धोके- काही घाट त्यांच्या तीव्र सौंदर्यासाठी प्रसिद्ध असले तरी, नैसर्गिक अडचणींमुळे ते धोकादायक बनतात
view comments8. वरंधा घाट आणि माळशेज घाट: माळशेज घाट धबधबे आणि धुक्यासाठी प्रसिद्ध आहे, तर वरंधा घाटातही धुकं मोठ्या प्रमाणात असते. धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आणि वेगावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, ज्यामुळे अपघात होतात. गगनबावडा घाट, आंबोली घाट, कशेडी हे घाटही तीव्र चढाव, वेडीवाकडी वळणे आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे धोकादायक ठरतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नजर हटी, दुर्घटना घटी! महाराष्ट्रातले 10 धोकादायक घाट, एक तर जीवघेणा ब्लॅक स्पॉट


