Weather Update: दक्षिणेकडे वारे फिरले! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रातल्या हवामानत होणार मोठा बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दक्षिण भारतात पुढचे सात दिवस मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात उष्णता आणि हलका पाऊस, कोकणात यलो अलर्ट, केरळ कर्नाटकला ऑरेंज अलर्ट, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा.
Weather Forecast: पुढचे सात दिवस दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. दक्षिण भारतात पुढचे सातही दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहणार आहे. तर महाराष्ट्रात दमट आणि पाऊस असं दुहेरी वातावरण राहिल्याने उष्णता वाढत आहे. देशातील अनेक भागातून दक्षिण पश्चिमी मान्सूनचे वारे परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल होते.
दक्षिणेकडे वारं फिरलं
दक्षिण भारत आणि मध्य बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाचं संकट आहे. त्याचा फटका महाराष्ट्राला देखील बसणार आहे. छत्री अजून आता ठेवण्याची वेळ आली नाही. त्याचं कारण असं की उकाडाही वाढणार आहे आणि पावसाच्या हलक्या सरी देखील पडणार आहेत. या मिश्र वातावरणामुळे हवेतील दमटपणा वाढू शकतो. पुढचे 7 दिवस महाराष्ट्रात हवामान कसं राहील? कुठे पाऊस पडेल ते जाणून घेऊया.
advertisement
पुढचे 24-48 तास महत्त्वाचे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मागच्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका बसला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात दमट वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. दक्षिणेला अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालच्या खाडीत दक्षिणेला सायक्लोनिक सर्क्युलेशन स्थिती तयार झाली आहे. त्याची कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी आणखी 24 तास वाट पाहावी लागेल. ही स्थिती अशीच राहली तर वादळाचा जास्त धोका नसेल. मात्र वारे फिरले तर मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 24 ते 48 तास हवामान विभाग या दोन्ही बदलांकडे लक्ष ठेवून आहे.
advertisement
कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची भीती
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे तयार होण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक या भागांना सर्वात जास्त धोका असेल. मात्र त्याची तीव्रता किती वाढते त्यावर महाराष्ट्रातही पाऊस राहणार का ते पाहावं लागणार आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी पुढच्या पाच दिवसांचे हवामानाचे अपडेट्स दिले आहेत. आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अति उष्ण तापमान राहू शकतं. तर तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा आहे. दक्षिणेकडील राज्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीतही वरच्या बाजूला दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी कोकणात पाऊस राहणार आहे.
advertisement
मच्छिमारांसाठी अलर्ट
view comments18 आणि 19 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहील, उकाडा वाढेल पण दक्षिण भारतात मात्र पाऊस राहणार आहे. त्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. केरळ, तमिळनाडून, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या भागातील मच्छिमारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मात्र मच्छिमारांसाठी तूर्तास कोणताही थेट धोका नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 6:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: दक्षिणेकडे वारे फिरले! अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रातल्या हवामानत होणार मोठा बदल