FASTag Annual Pass Rules: 3000 रुपयांत फक्त 200 ट्रिप फ्री, त्या संपल्यावर पुढे काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
FASTag Annual Pass Rules: नितीन गडकरी यांनी फास्टॅग टोलसाठी 3000 रुपयांचा पास जाहीर केला, ज्यामुळे 200 ट्रिप करता येतील. हा पास राष्ट्रीय महामार्गांवर लागू होईल, परंतु महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर नाही.
FASTag Annual Pass Rules: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग टोलबाबत महत्त्वाची घोषणा केली. बुधवारी त्यांनी फास्टॅग टोलसाठी पास घेता येणार असं सांगितलं. 3000 रुपयांचा पास काढून तुम्ही 200 ट्रिप फिरू शकता. ज्या 200 ट्रिपसाठी लोकांना 10 हजार टोल भरावा लागायचा तेच आता 7000 रुपये वाचवून 3000 रुपये पास काढावा लागणार आहे. अर्थातच हा पास कंपल्सरी नाही. हा पास केवळ खासगी कारसाठी असणार आहे. या पाससंदर्भात अनेक प्रश्न, संभ्रम मनात आहेत.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पास फक्त राष्ट्रीय प्राधिकरण अंतर्गत असलेल्या महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर चालणार आहे. राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गांवर किंवा एक्सप्रेस वेवर चालणार नाही. महाराष्ट्रात एकूण 87 टोलनाके आहेत. मात्र त्यापैकी 18 टोल नाक्यांवर हा पास चालणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एवढा फायदेशीर होणार नाही असंही काही जणांचं म्हणणं आहे.
advertisement
तरीसुद्धा ज्यांना हा पास काढायचा आहे त्यांनी याचे काही नियम समजून घ्यायला हवेत. या 3000 रुपयांमध्ये तुम्हाला केवळ 200 ट्रिप करता येणार आहेत. त्यानंतर काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडूच शकतो. NHAI च्या माहितीनुसार, हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी व्हॅलिड असेल. जर एखादा वाहनचालक दररोज महामार्गावरून प्रवास करत असेल आणि त्याचे 200 ट्रिप चार महिन्यांतच पूर्ण झाले, तर त्याला पुन्हा नवीन ATP घ्यावा लागेल. अशा प्रकारे, तो वर्षातून अनेक ATP खरेदी करू शकतो. ATP घेण्यावर कोणतीही मर्यादा नाही; वाहनचालकाला गरजेनुसार कितीही पास घेता येतील.
advertisement
जर एखाद्या वाहनचालकाने ATP खरेदी केला, परंतु राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर कमी प्रवास केल्यामुळे त्याचे 200 ट्रिप पूर्ण झाले नाहीत, तर ATP मध्ये शिल्लक राहिलेले पैसे परत मिळणार नाहीत, तसेच ते पुढील पाससाठी ट्रान्सफर देखील केले जाणार नाहीत. पासमध्ये राहिलेली उर्वरित रक्कम वाया जाईल. त्यामुळे, घेतलेल्या पासचा पूर्ण वापर करणेच वाहनचालकांसाठी बंधनकारक असेल. या पासची वैधता काढलेल्या तारखेपासून बरोबर एक वर्ष असेल. त्यानंतर पुन्हा नवीन पास काढावा लागेल.
advertisement
महाराष्ट्रात मात्र एक्सप्रेस वे, अटल सेतू, समृद्धी महामार्गावर हा पास लागू होणार नाही. राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही टोल नाक्यांवर अथवा महामार्ग, एक्सप्रेस वेवर हा पास लागू होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी जरा हा पास काढणं अडचणीचं आहे. तसंही फास्ट टॅगसाठी मिनिमम रक्कम 200 रुपये ठेवणं बंधनकारक आहे. 3000 रुपये अडकवून जर तेवढं फिरणं वर्षभरात झालंच नाही तर तुमचे पैसे आणि पास दोन्ही वाया जाऊ शकतं.
advertisement
समजा जर तुमच्या 200 ट्रिप पूर्ण झाल्या तर तुम्हाला पैसे भरावे लागतील किंवा नवीन पास घ्यावा लागेल. एका वर्षात तुम्ही किती पास घ्यावेत यावर तूर्तास तरी सरकारकडून कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. त्यामुळे तुम्ही एकपेक्षा जास्त पास घेऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
FASTag Annual Pass Rules: 3000 रुपयांत फक्त 200 ट्रिप फ्री, त्या संपल्यावर पुढे काय?