Modis Mission पुस्तकाचं प्रकाशन, राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोहळ्यासाठी उपस्थित
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Modis Mission पुस्तक प्रकाशनात राजभवनात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आध्यात्मिक आणि दैवी महत्त्व अधोरेखित झाले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बर्जीस देसाई उपस्थित.
Modis Mission या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पुस्तकाचे लेखक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मोदींच्या नेतृत्वाचे महत्त्व केवळ राजकीय नाही, तर आध्यात्मिक आणि दैवी असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे विधान सर्वाधिक लक्ष वेधून घेणारं होतं. नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे पंतप्रधान नाहीत, तर एक विचार आहेत, एक आध्यात्मिक शक्ती आहेत, प्रेरणास्रोत आहेत आणि देशाचा अभिमान आहेत." भागवत गीतेतील 'यदा यदा ही धर्मस्य' या श्लोकाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, जेव्हा जेव्हा गरज भासते, तेव्हा दैवी हस्तक्षेपामुळे अशा व्यक्तिमत्त्वाचा उदय होतो आणि मोदींचे पंतप्रधान बनणे हे ईश्वरी व्यवस्थेतून झाल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला.
advertisement
सामान्य लोक व्यवस्थेचे पालन करतात, पण महान पुरुष आपला मार्ग आणि नवी व्यवस्था तयार करतात, ज्याचे अनुसरण लोक करतात. "मोदींनी हेच केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कलम ३७० हटवले आणि राम मंदिर उभारले. ही कामे अशक्य मानली जात होती, पण त्यांनी ती सहज करून दाखवली. हे केवळ निष्पाप लोककल्याणाचे मिशन असलेल्या व्यक्तीलाच शक्य आहे."
advertisement
'एका फोनवर युद्ध थांबवणारे नेते'
राज्यपाल देवव्रत यांनी दावा केला की, मोदींनी मिळवलेले सामर्थ्य आणि सन्मान जगभर आहे. "मोदींच्या केवळ एका फोन कॉलवर रशिया आणि युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी युद्ध काही काळासाठी थांबवले होते," असे त्यांनी सांगितले. "प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा की मोदींचा जन्म भारतात झाला."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, मोदींनी विकसित भारत २०२४७ चा पाया रचला आहे आणि आता कोणीही त्याला थांबवू शकत नाही. "मोदी हे केवळ आणखी एक पंतप्रधान नाहीत, तर त्यांनी २१ व्या शतकात भारताला आकार दिला आहे," असे ते म्हणाले. "कर चुकवणाऱ्या समाजाचे रूपांतर त्यांनी कर-पालक समाजात केले. त्यांनी न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांना आदर दिला आहे आणि न्यायिक सुधारणा लवकरच होतील, अशी आशा आहे."
advertisement
LIVE | 'MODI'S MISSION' book launch ceremony
🕡 6.27pm | 24-10-2025📍RajBhavan, Mumbai.@narendramodi @maha_governor #Maharashtra #Mumbai #ModisMission https://t.co/jIyqrYWjCZ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2025
ध्रुव ताऱ्यासारखे प्रेरणास्रोत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात एक महत्त्वपूर्ण सूचना केली. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या पुस्तकातील एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.
advertisement
तर पुस्तकाचे लेखक बर्जीस देसाई यांनी मोठी भविष्यवाणी केली. ते म्हणाले की, २० वे शतक महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखले गेले, तसेच २१ वे शतक नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाईल. "आजपासून ५० वर्षांनंतर, गांधी आणि मोदींचा उल्लेख एकाच वेळी, एकाच श्वासात केला जाईल आणि आधुनिक भारताच्या इतिहासात मोदींना महत्त्वाचे स्थान मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Modis Mission पुस्तकाचं प्रकाशन, राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोहळ्यासाठी उपस्थित


