advertisement

Mumbai : वडील रुममध्ये शोधत होते, मुलाने थेट 21 व्या मजल्यावरून मारली उडी, मुंबईतील मन सुन्न करणारी घटना

Last Updated:

Wadala Shocking Incident : मुंबईतील वडाळा परिसरात एका तरुणाने 21 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची केल्याची धक्कादायक घटना घडली.

News18
News18
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वडाळा येथील एका बहुमजली इमारतीत राहणाऱ्या तरुणाने आपल्या इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वडिलांनी टोकलं म्हणून मुलाने टोकाचं पाऊल उचलंल
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हैदर कराचीवाला असे असून त्याला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत होते आणि कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी सकाळी हैदरचा त्याच्या कुटुंबीयांशी वाद झाला. वादानंतर तो रागाच्या भरात घराबाहेर पडला.
पहाटे घरी परतला मात्र 
यानंतर पहाटे चारच्या सुमारास विलेपार्ले पोलिस ठाण्यातून हैदरचे वडील युसूफ कराचीवाला यांना फोन आला. पोलिसांनी हैदर दारूच्या नशेत आढळल्याचे सांगत त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. रविवारी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास वडील हैदरला घरी घेऊन आले.
advertisement
घरी आल्यानंतर हैदरच्या पालकांनी त्याच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला. यानंतर हैदर आपल्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. सकाळी सुमारे 8.15 वाजता हैदरने खोलीतून उडी मारल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे कराचीवाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : वडील रुममध्ये शोधत होते, मुलाने थेट 21 व्या मजल्यावरून मारली उडी, मुंबईतील मन सुन्न करणारी घटना
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement