Air India Plane Crash : 'इंजिन बंद का केलं?', प्लेन क्रॅशआधी दोन्ही पायलटचं शेवटचं संभाषण, खळबळजनक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अहमदाबादमध्ये 12 जूनला झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा रिपोर्ट आला आहे. भारतीय विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने एअर इंडिया विमान अपघाताचा रिपोर्ट दिला आहे.
नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये 12 जूनला झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा रिपोर्ट आला आहे. भारतीय विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने एअर इंडिया विमान अपघाताचा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये दोन्ही पायलटमध्ये अपघाताआधी काय संभाषण झालं, त्याची माहितीही देण्यात आली आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये कॅप्टन सुमित सभरवाल आणि क्लाईव्ह कुंदर यांच्यातलं संभाषण रेकॉर्ड झालं आहे. सुमित सभरवाल यांना 8,200 तासांचा तर क्लाईव्ह कुंदर यांना 1100 तासांचा अनुभव होता.
प्लेन क्रॅशआधी दोघांचं संभाषण
'तू इंजिन का बंद केलंस?' असं एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारलं आहे, त्यावर मी काहीही केलं नाही, असं उत्तर दुसऱ्याने दिलं आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून दोन्ही पायलटमध्ये झालेलं हे संभाषण समोर आलं आहे, पण यातलं कोणतं वाक्य कोणत्या पायलटने म्हटलं? याबाबतची माहिती रिपोर्टमध्ये उघड करण्यात आलेली नाही. पण पायलटनी इंजिन बंद केलेलं नसल्याचं त्यांच्या संभाषणातून स्पष्ट होत आहे.
advertisement
मेडे चा कॉल
अहमदाबादच्या विमानतळावरून फ्लाईटने टेक ऑफ केल्याच्या काही सेकंदांमध्ये पायलटने मेडेचा कॉल दिला. यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने यावर प्रतिसाद दिला, पण त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एटीसीओने धावपट्टी ओलांडण्यापूर्वी विमान खाली पडताना पाहिले आणि आपत्कालीन सेवा सुरू केल्या. अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी निघाले, त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या पथकांनीही बचाव कार्य सुरू केले, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
advertisement
विमानाची दोन्ही इंजिन फेल
विमानाची दोन्ही इंजिन टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदांनी अचानक बंद पडली, ज्यामुळे विमान कोसळलं, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. AAIB च्या 15 पानांच्या अहवालानुसार, विमानाने १८० नॉट्सचा कमाल निर्देशित एअरस्पीड (IAS) गाठला. त्यानंतर लगेचच, इंजिन-1 आणि इंजिन-2 चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनला इंधन पाठवतात) 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत हलले आणि तेही फक्त 1 सेकंदाच्या अंतराने, ज्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले आणि दोन्ही इंजिनचा N1 आणि N2 रोटेशन स्पीड वेगाने कमी होऊ लागला.
advertisement
260 जणांचा मृत्यू
12 जून रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान (फ्लाइट एआय 171) टेकऑफनंतर लगेचच मेडिकल हॉस्टेलला जाऊन धडकले. या भीषण अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 260 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात फक्त एक प्रवासी बचावला.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
July 12, 2025 5:17 AM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash : 'इंजिन बंद का केलं?', प्लेन क्रॅशआधी दोन्ही पायलटचं शेवटचं संभाषण, खळबळजनक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर