पाकिस्तान व्याप्त काश्मीर(PoK)वर मोहन भागवतांचे आजवरचे कठोर वक्तव्य; भाषणाने देशभरात चर्चा पेटली, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
RSS chief Mohan Bhagwat On PoK: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ठामपणे म्हटलं आहे की पाक अधिकृत काश्मीर (PoK) हे भारताच्या घरातीलच एक “खोली” आहे, जी परक्यांनी व्यापली आहे आणि ती परत घ्यायचीच आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशभरात चर्चेला उधाण आलं असून PoK मधील वाढत्या असंतोषावर त्यांनी थेट भाष्य केलं.
साटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) हा भारतातील एक असा खोली असल्याचे म्हटले आहे, जी अनोळखी लोकांनी व्यापून ठेवली आहे आणि ती परत घेतलीच पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी हे विधान मध्य प्रदेशातील साटना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान केल्याचे वृत्त ANIने दिले.
advertisement
भागवत म्हणाले, इथे अनेक सिंधी बंधू बसलेले आहेत. मला खूप आनंद आहे. ते पाकिस्तानला गेले नाहीत, ते अखंड भारतातच गेले होते. परिस्थितीने आपल्याला त्या घरातून इथे आणले कारण ते घर आणि हे घर वेगळे नाहीत. त्यांच्या या विधानावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
advertisement
ते पुढे म्हणाले- संपूर्ण भारत हे एकच घर आहे. पण कोणीतरी आपल्या घरातील एक खोली काढून घेतली आहे. जिथे माझी टेबल, खुर्ची आणि कपडे ठेवलेले असायचे. त्यांनी ती खोली ताब्यात घेतली आहे. उद्या ती खोली मला परत मिळवायची आहे…, असे म्हणताच उपस्थित लोकांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या.
advertisement
#WATCH | Satna, MP | RSS Chief Mohan Bhagwat says, "Many Sindhi brothers are sitting here. I am very happy. They did not go to Pakistan; they went to undivided India....Circumstances have sent us here from that home because that home and this home are not different. The whole of… pic.twitter.com/CdNaLdzwQc
— ANI (@ANI) October 5, 2025
advertisement
भागवत यांचे हे वक्तव्य त्या पार्श्वभूमीवर आले आहे, जेव्हा पाकिस्तान अधिकृत काश्मीर (PoK) मध्ये पाकिस्तानी सत्तेविरोधात असंतोष वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी अवामी ॲक्शन कमिटी (AAC) च्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली आहेत. ज्यात आर्थिक मदत आणि राजकीय सुधारणांची मागणी करण्यात आली आहे.
advertisement
गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये PoK मध्ये 10 जण ठार झाले आहेत आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. धिरकोट (बाग जिल्हा) येथेच चार आंदोलनकर्त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर मुजफ्फराबाद, डडयाल (मीरपूर) आणि चम्याती (कोहाला जवळ) या भागांमधूनही मृत्यूच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
advertisement
विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्यामुळे या राजकीय संवेदनशील प्रदेशातील तणाव अधिकच वाढला आहे. PoK मधील नागरिकांच्या पाकिस्तानविरोधी निदर्शनांमुळे इस्लामाबादने 1947 पासून जो खोटा दावा पसरवला आहे तो उघड झाला आहे, असे तज्ज्ञ म्हणतात. याचबरोबर ज्यांनी दशकानुदशके जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत भारतविरोधी प्रचार वाढवण्याचे काम केले, त्यांचेही मुखवटे आता पडले आहेत.
गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात RSS प्रमुखांनी भारताच्या सुरक्षा क्षमतेला अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया भारताच्या जागतिक मैत्रीचे खरे स्वरूप दाखवून गेल्या.
भागवत म्हणाले, इतर देशांची प्रतिक्रिया हा एक कसोटीचा क्षण होता — जागतिक पातळीवर आपले खरे मित्र कोण आहेत आणि ते आपल्यासोबत किती प्रमाणात उभे राहू शकतात हे त्यातून स्पष्ट झाले. त्यांनी पुढे सांगितले की- भारताच्या राजकीय नेतृत्वाने आणि सैन्य दलांनी “योग्य आणि ठाम प्रत्युत्तर” दिले, ज्यातून नेतृत्वाची ठामता, सशस्त्र दलांचा पराक्रम, तसेच समाजाची एकता आणि निर्धार स्पष्ट दिसून आला.
PoK मधील अलीकडच्या आंदोलनांच्या लाटेमुळे स्थानिक लोक आणि इस्लामाबाद यांच्यातील दरी आणखी वाढताना दिसते आहे. तज्ज्ञांचा इशारा आहे की पाकिस्तानने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग कायम ठेवल्यास या महत्त्वाच्या भागातील अस्थिरता आणखी वाढू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 9:26 PM IST
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तान व्याप्त काश्मीर(PoK)वर मोहन भागवतांचे आजवरचे कठोर वक्तव्य; भाषणाने देशभरात चर्चा पेटली, Video