भांडवल फक्त १५,००० रु, नोव्हेंबरमध्ये या शेतीतून फक्त ४० दिवसांत कमवा २ ते ३ लाख रुपये

Last Updated:
Agriculture News : नोव्हेंबरमध्ये मेथीची शेती करून ४० दिवसांत लाखो रुपये कमविण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना आहे.
1/6
agriculture news
नोव्हेंबरमध्ये मेथीची शेती करून ४० दिवसांत लाखो रुपये कमविण्याची मोठी संधी शेतकऱ्यांना आहे. हवामानानुसार सध्या रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून, कमी खर्चात आणि अल्पावधीत जास्त नफा देणाऱ्या पिकांमध्ये मेथीचे पीक सर्वात फायदेशीर मानले जात आहे. मग आता लागवड कशी करायची? खर्च आणि किती नफा मिळू शकतो? या बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत...
advertisement
2/6
agriculture
मेथीची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यात करणे सर्वात फायदेशीर ठरते. थंड हवामानात हे पीक चांगले वाढते आणि ३० ते ४० दिवसांत काढणीस तयार होते. हलकी ते मध्यम काळी जमीन मेथी लागवडीसाठी योग्य असते. पेरणीपूर्वी नांगरणी करून शेणखत किंवा कंपोस्ट टाकल्यास पीक अधिक भरघोस येते.
advertisement
3/6
agriculture
बियाणे व खर्च -  एक एकर लागवडीसाठी साधारण ८ ते १० किलो बियाणे लागतात. स्थानिक बाजारात मेथीचे बियाणे प्रति किलो ८० ते १२० रु किलो दराने मिळते. म्हणजेच बियाण्यांवर अंदाजे ८०० ते १,२०० खर्च येतो. त्यासोबतच नांगरणी, खत, पाणी व मजुरी मिळून एकरी एकूण खर्च सुमारे १५,००० ते २०,००० पर्यंत येतो. ड्रिप सिंचनाचा वापर केल्यास पाणी आणि खत दोन्हीची बचत होते आणि उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होते.
advertisement
4/6
उत्पादन आणि नफा
उत्पादन आणि नफा - मेथी हे झटपट वाढणारे पीक असून ४० दिवसांतच बाजारात विक्रीस तयार होते. एक एकरातून सरासरी ८ ते १० क्विंटल हिरवी मेथी मिळू शकते. सध्या बाजारभाव ३० ते ५० प्रति किलोपर्यंत आहे. म्हणजेच एका एकरातून साधारण २.५ ते ४ लाख रुपये मिळू शकतात. खर्च वजा करता शेतकऱ्याला एकरी किमान २ ते ३ लाख रुपयांचा नफा सहज मिळतो.
advertisement
5/6
agriculture
जर बाजारात हिरव्या मेथीचा दर कमी असेल तर शेतकरी मेथी वाळवून (ड्राय मेथी) विक्री करून अधिक नफा कमवू शकतात. वाळवलेली मेथी मसाल्याच्या स्वरूपात विकली जाते आणि तिचा दर १५० ते २५० रु प्रति किलोपर्यंत असतो.
advertisement
6/6
agriculture
लागवड पद्धत -  मेथीच्या लागवडीसाठी शेत नांगरून ५ ते ७ सें.मी. अंतरावर सरी पाडाव्यात.दर दोन दिवसांनी हलके पाणी द्यावे. वाढीच्या टप्प्यात सेंद्रिय खत किंवा वर्मी कंपोस्ट टाकल्यास पाने मऊ व सुगंधी राहतात. कीड व रोगांचा त्रास फारसा नसतो, पण पानांवर डाग येऊ लागल्यास जैविक कीटकनाशकांचा फवारा करावा.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement