Weather Alert: 48 तास धोक्याचे, वादळी पाऊस, गारपीट अन् ..., महाराष्ट्रावर तिहेरी संकट, 21 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून उष्णतेच्या लाटेनंतर वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला आहे.
महाराष्ट्रावर ऐन उन्हाळात अस्मानी सकंट धुमशान घालत आहे. मंगळवारी राज्याला उष्णतेची लाट, गारपीट, तर काही ठिकाणी वादळी पाऊस अशा तिहेरी संकटानं घेरलं. आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास धोक्याचे असून 21 हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 18 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुंबईसह कोकणात देखील हवापालट झाली आहे. उष्ण आणि दमट हवामानाचा संकट टळलं आहे. तर आता अस्मानी संकटाने डोके वर काढलं आहे. आज ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत 31-33 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. तसेच 2 दिवस हलका पाऊस होईल.
advertisement
दरम्यान, राज्यातील उष्णतेच्या लाटेचा जोर काही भागात ओसरला असला तरी उन्हाचे चटके कायम आहेत. वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच गहू, हरभरा, ज्वारी, फळबागा यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची आणि फळबागांची काळजी घ्यावी लागेल.








