अक्षय्य तृतीयेला जुळून येणार 3 शुभ योग, सोनं खरेदीचा मुहूर्त अजिबात चूकवू नका!

Last Updated:
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीय सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी पाळलेल्या उपवासातून आणि केलेल्या दानातून भरपूर पुण्य मिळतं असं म्हणतात. शिवाय यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक अत्यंत शुभ संयोग निर्माण होणार आहे. यंदाची अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्रात आहे, शिवाय याच दिवशी परशुराम जयंती साजरी होईल आणि याच दिवशी गंगा देवी प्रकट झाली होती असं ज्योतिषी सांगतात. त्यामुळे ही अक्षय्य तृतीया कशी खास आहे, जाणून घेऊया. (विक्रम झा, प्रतिनिधी / पूर्णिया)
1/5
ज्योतिषी मनोत्पल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि आई होण्यासाठी महिला अक्षय्य तृतीयेला उपवास पाळतात. शिवाय या दिवशी सोनं खरेदी केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो, अशी मान्यता आहे.
ज्योतिषी मनोत्पल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि आई होण्यासाठी महिला अक्षय्य तृतीयेला उपवास पाळतात. शिवाय या दिवशी सोनं खरेदी केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो, अशी मान्यता आहे.
advertisement
2/5
महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एकाच दिवशी तीन योग जुळून येणार आहेत. गज-केसरी, शुक्रवासा आणि शास्त्रीय या तीन योगांमुळे आपल्या आयुष्याची सुख-समृद्धीने अगदी भरभराट होईल.
महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एकाच दिवशी तीन योग जुळून येणार आहेत. गज-केसरी, शुक्रवासा आणि शास्त्रीय या तीन योगांमुळे आपल्या आयुष्याची सुख-समृद्धीने अगदी भरभराट होईल.
advertisement
3/5
अक्षय्य तृतीयेला सकाळी 9:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 12:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत सोनं खरेदीसाठी शुभ मुर्हूत आहे. तसंच तुम्ही या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंतही सोनं खरेदी करू शकता.
अक्षय्य तृतीयेला सकाळी 9:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 12:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत सोनं खरेदीसाठी शुभ मुर्हूत आहे. तसंच तुम्ही या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंतही सोनं खरेदी करू शकता.
advertisement
4/5
  सर्वात आधी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे  करावी. त्यानंतरच दिवसभरातील कामं करावी, असं ज्योतिषांनी आवर्जून सांगितलं. तसंच या दिवशी अन्नधान्य, वस्तू, आणि पाण्याचं भांड दान करण्यालाही विशेष महत्त्व असतं.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सर्वात आधी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी. त्यानंतरच दिवसभरातील कामं करावी, असं ज्योतिषांनी आवर्जून सांगितलं. तसंच या दिवशी अन्नधान्य, वस्तू, आणि पाण्याचं भांड दान करण्यालाही विशेष महत्त्व असतं.
advertisement
5/5
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement