Rohit Sharma : रोहित सेफ, पण गंभीरचं टेन्शन वाढलं; टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचे करिअर संकटात!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधून रोहित शर्माने 7 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. 3 मॅचच्या या सीरिजमध्ये रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं, याचसोबत त्याने टीकाकारांची बोलतीही बंद केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऋतुराज गायकवाडही मागच्या काही काळापासून टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण इतकी तीव्र स्पर्धा असल्यामुळे ऋतुराजला खेळण्याची संधी मिळत नाहीये. ऋतुराजने भारताकडून 6 वनडे खेळल्या, ज्यात त्याने 19.17 च्या सरासरीने 115 रन केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. ऋतुराजला वनडेमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलं नसलं, तरी त्याची क्षमता अनेकांनी आयपीएलमध्ये पाहिली आहे.
advertisement
देवदत्त पडिक्कल याला अजून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही, पण तो स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. पडिक्कल त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा दरवाजा वारंवार ठोठावत आहे, पण ओपनर असलेल्या पडिक्कलची निवड करायची असेल, तर त्याला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? असा प्रश्न निवड समितीसमोर आहे.


