काहीही झालं तरी 'या' लोकांनी अंत्यसंस्कारात होऊ नये सहभागी, पुराणातही दिलीय 'स्ट्रिक्ट वॉर्निंग'

Last Updated:

हिंदू धर्मात 'गरुड पुराण' या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये मानवाचा जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन दिले आहे. अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे.

News18
News18
Who Should Not Attend Last Rites : हिंदू धर्मात 'गरुड पुराण' या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये मानवाचा जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन दिले आहे. अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. गरुड पुराणानुसार, अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत काही विशिष्ट व्यक्तींनी जाणे टाळले पाहिजे. यामागे केवळ धार्मिकच नव्हे, तर शास्त्रीय आणि मानसिक कारणे देखील आहेत.
गर्भवती महिला
गरुड पुराणानुसार, गर्भवती महिलेने स्मशानभूमीत जाणे पूर्णपणे निषिद्ध आहे. स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. गर्भस्थ शिशु अत्यंत कोमल आणि संवेदनशील असतो. ही नकारात्मक ऊर्जा गर्भातील बाळावर आणि आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. तसेच, स्मशानभूमीतील वातावरण पाहून महिलेला होणारा मानसिक त्रास बाळासाठी घातक ठरू शकतो.
लहान मुले
लहान मुलांना स्मशानभूमीत नेणे टाळावे, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती आणि मानसिक शक्ती कमी असते. स्मशानभूमीतील दृश्ये किंवा रडणे-ओरडणे पाहून मुले घाबरू शकतात. यामुळे त्यांच्या मनावर कायमचा भीतीदायक परिणाम होऊ शकतो. तसेच, तिथल्या धुरामुळे त्यांना श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता असते.
advertisement
आजारी व्यक्ती
ज्या व्यक्तींचे शरीर आधीच व्याधींनी ग्रासलेले आहे, त्यांनी अंत्यसंस्कारात जाणे टाळावे. स्मशानभूमीत मृतदेह जाळताना निघणारा धूर आणि वातावरणातील विषाणू आजारी व्यक्तीच्या शरीरात लवकर प्रवेश करू शकतात. यामुळे त्यांचा आजार अधिक बळावू शकतो.
ज्यांच्या घरी आधीच सुतक सुरू आहे
ज्यांच्या कुटुंबात अलीकडेच कोणाचा मृत्यू झाला आहे आणि ज्यांचे 'सुतक' अजून संपलेले नाही, त्यांनी दुसऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नये. शास्त्रानुसार, सुतक असलेल्या व्यक्तीची शुद्धी झालेली नसते. अशा स्थितीत दुसऱ्याच्या अंत्यविधीला गेल्याने दोन्ही कुटुंबांतील आध्यात्मिक ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो.
advertisement
अतिशय संवेदनशील किंवा भावनिक व्यक्ती
ज्या व्यक्तींचे मन खूप हळवे आहे किंवा जे दुःख सहन करू शकत नाहीत, त्यांनी स्मशानभूमीपासून दूर राहावे. अंत्यविधीच्या वेळी 'कपाल मोक्ष' किंवा मृतदेह जळतानाचे दृश्य पाहून अशा व्यक्तींना मानसिक धक्का बसू शकतो. यामुळे त्यांच्या मनात नैराश्य किंवा तीव्र भीती निर्माण होऊ शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
काहीही झालं तरी 'या' लोकांनी अंत्यसंस्कारात होऊ नये सहभागी, पुराणातही दिलीय 'स्ट्रिक्ट वॉर्निंग'
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement