IND vs SA 5th T20i : लखनऊनंतर आता पाचवी टी-ट्वेंटी मॅचही रद्द होणार? कसा आहे Ahmedabad चा AQI?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs SA Ahmedabad AQI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आता अखेरचा सामना होणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे.
लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर झालेला चौथा सामना एकाही बॉलचा खेळ न होता रद्द करावा लागला. धुक्याचा दाट थर आणि खराब व्हिजिबिलिटीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याने आता चाहत्यांची नजर मालिकेतील शेवटच्या लढतीकडे लागली आहे.

मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशातच आता लखनऊप्रमाणे इथंही सामना रद्द होणार का? असा सवाल विचारला जातोय. अहमदाबादमध्ये देखील AQI जास्त आहे का? जाणून घ्या.
advertisement

हवेच्या गुणवत्तेबाबत बोलायचे झाले तर, हार्दिक पांड्याला मास्क लावून सराव करताना पाहिल्यावर चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती. लखनऊमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 490 च्या वर पोहोचला होता, जो अत्यंत घातक मानला जातो.
advertisement

अहमदाबादमध्ये सध्या ही पातळी 174 च्या आसपास असून ती 'अस्वस्थ' श्रेणीत मोडते. तरीही, सुदैवाने इथली परिस्थिती लखनऊच्या तुलनेत बरी असल्याने व्हिजिबिलिटीवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही.
advertisement

दरम्यान, सामना होणार असल्याची परिस्थिती असताना दुसरीकडे खेळाडूंच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचं पहायला मिळतंय. साडेतीन तास खेळाडूंना याच प्रदुषित हवेखाली खेळावं लागतंय. त्यामुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
advertisement
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
Dec 19, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 5th T20i : लखनऊनंतर आता पाचवी टी-ट्वेंटी मॅचही रद्द होणार? कसा आहे Ahmedabad चा AQI?









