बीड : बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपासून दूर जात राजमा म्हणजेच घेवडा पिकाचा प्रयोग हाती घेतला असून, कमी क्षेत्रातही उत्तम उत्पन्न मिळत असल्याची माहिती मिळत आहे. राजमा हे स्वभावतः नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढवणे, रासायनिक खतांचा खर्च कमी करणे आणि अल्प पाण्यातही पीक तगवणे या तिन्ही बाबींमध्ये ते अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मुळांवरील राईझोबियम जिवाणू हवेतला नायट्रोजन थेट जमिनीत साठवतात, यामुळे जमिनीत नैसर्गिक सुपीकतेचा थर तयार होतो आणि पुढील पिकांनाही त्याचा फायदा मिळतो.
Last Updated: December 11, 2025, 13:23 IST


