PM धनधान्य कृषी योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना होणार लाभ? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Last Updated:

PM dhan dhanya krushi yojana : केंद्र सरकारने शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला’ मंजुरी देण्यात आली.

pm dhan dhanya krushi yojana
pm dhan dhanya krushi yojana
मुंबई : केंद्र सरकारने शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला’ मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 100 निवडक जिल्ह्यांतील सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, पीक साठवणूक आणि आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.
योजनेचा उद्देश आणि कार्यपद्धती
योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीचे आधुनिकीकरण, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे. या योजनेतून कमी उत्पादनक्षमता, मध्यम पीक तीव्रता आणि मर्यादित कर्ज उपलब्धता असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार कृषी विषयक विविध 36 योजना एकत्र करून हा समन्वित उपक्रम राबवण्यात येणार आहे. यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाली असून, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची अधिकृत घोषणा केली.
advertisement
शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणारी योजना
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे, सुधारित बियाणे, तंत्रज्ञान आणि अचूक शेती साधनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. पीक साठवणूक आणि पुरवठा साखळीची क्षमता वाढवण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवणूक सुविधा, गोदामे आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. त्याचप्रमाणे, सिंचन सुविधांचा विस्तार, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि हवामान-अनुकूल शेती या घटकांवर विशेष भर दिला जाईल.
advertisement
या घटकांना योजनेचा लाभ मिळणार
अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी, जे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उत्पादन वाढवू इच्छितात. एफपीओ, कृषी सहकारी संस्था, ज्या बाजारात थेट पोहोच साधून चांगल्या दरात माल विक्रीसाठी प्रयत्नशील आहेत. कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्स, जे नवकल्पनांद्वारे उत्पादकता वाढवत आहेत. महिला शेतकरी आणि स्वयंसहायता गट, जे तंत्रज्ञान आधारित शेतीमध्ये कार्यरत आहेत.
ग्रामीण समुदाय, ज्यांना सुधारित पायाभूत सुविधा, रोजगार आणि वित्त सहाय्याचा लाभ मिळणार आहे.
advertisement
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचे लाभ कोणते?
शाश्वत आणि हवामान-लवचिक शेतीला प्रोत्साहन.
आधुनिक सिंचन प्रणाली आणि उत्पादनक्षम तंत्रज्ञानाचा वापर.
कापणीनंतर साठवणूक आणि लॉजिस्टिक्ससाठी सुधारित पायाभूत सुविधा.
बाजारपेठांमध्ये थेट पोहोच आणि चांगले दर मिळवण्यासाठी सहकार्य.
लहान शेतकऱ्यांसाठी कर्ज व तांत्रिक सहाय्य.
दरम्यान, ही योजना देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक नवा अध्याय ठरणार असून, ग्रामीण शेतीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या योजनेत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM धनधान्य कृषी योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना होणार लाभ? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement