Agriculture News : शेतीला मिळेल नवसंजीवनी, माती सुधारण्यासाठी करा हे 3 नैसर्गिक उपाय, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

आजच्या घडीला जमिनीची सुपीकता कमी होणे हे शेतीसमोरील सर्वात मोठे प्रश्नांपैकी एक मानले जात आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, पाण्याची कमतरता आणि जास्त मशागत यामुळे मातीची रचना बिघडत आहे.

+
माती

माती सुधारण्याचे तीन नैसर्गिक उपाय

बीड : आजच्या घडीला जमिनीची सुपीकता कमी होणे हे शेतीसमोरील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक मानले जात आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, पाण्याची कमतरता आणि जास्त मशागत यामुळे मातीची रचना बिघडत आहे. विज्ञान सांगते की मातीला जिवंत ठेवण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव असणे अत्यावश्यक आहे आणि हे सूक्ष्मजीव वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नैसर्गिक पद्धत. अभ्यासानुसार नैसर्गिक उपायांद्वारे माती सुधारल्यास उत्पादनात 20-25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी माती सुधारण्याचे उपाय हे आजच्या काळाची गरज ठरत आहेत. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे.
पहिला उपाय म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत (Vermicompost) आणि जैविक खत यामुळे मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. प्रति एकर किमान 1 ते 1.5 टन सेंद्रिय खत दिल्यास माती भुसभुशीत राहते आणि pH संतुलन राखले जाते. या खतांमुळे मातीतील घटक नैसर्गिक पद्धतीने विघटित होऊन पिकांना पोषकद्रव्ये उपलब्ध होतात. सेंद्रिय खत हे केवळ माती सुधारण्याचे नाही, तर पाण्याची क्षमता वाढवण्याचेही प्रभावी साधन आहे.
advertisement
दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे ग्रीन मॅन्युअर किंवा हिरवी खते. यात ढेंचा, सुरी, धैंचा किंवा सन हेम्प सारखी जलद वाढणारी पिके घेतली जातात. साधारण 60 ते 70 दिवसांत ही पिके जमिनीत उलथवून टाकली जातात. या प्रक्रियेमुळे मातीमध्ये नैसर्गिक पद्धतीने नायट्रोजन तयार होते. यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि शेतीचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो. तज्ज्ञांच्या मते हिरवी खते नियमित वापरल्यास मातीचे नैसर्गिक आरोग्य टिकवता येते.
advertisement
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मल्चिंग. पिकांच्या आसपास गवत, ऊसाच्या पानांचा चुरा किंवा सोयाबीनच्या अवशेषांचा वापर केल्यास मातीतील ओलावा टिकून राहतो. तण वाढत नाहीत आणि पाण्याचा अपव्ययही थांबतो. काही शेतकरी प्लास्टिक मल्चिंगचाही वापर करतात, ज्यामुळे खतांचा प्रभाव थेट पिकावर होतो. मल्चिंगमुळे मातीतील कार्बनचे प्रमाण वाढते आणि जमिनीतील तापमान संतुलित राहते.
advertisement
वरील तिन्ही उपाय पद्धतशीरपणे अमलात आणले तर जमिनीचे नैसर्गिक पुनरुज्जीवन शक्य होते. रासायनिक खतांवर अवलंबून न राहता नैसर्गिक शेतीकडे वळणे हे आजच्या शेतीसाठी सर्वात मोठे परिवर्तन ठरू शकते. भारतातील अनेक शेतकऱ्यांनी हे उपाय अवलंबून उत्पादनात चांगली वाढ अनुभवली आहे. शेतीचे भविष्य रासायनिक नव्हे तर नैसर्गिक मातीच्या पुनरुत्पादनात आहे, हे लक्षात ठेवणे आता काळाची गरज बनली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतीला मिळेल नवसंजीवनी, माती सुधारण्यासाठी करा हे 3 नैसर्गिक उपाय, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement