नेमका वाद काय?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीची निवडणूक 3 वर्षांपूर्वी झाली होती. या निवडणुकीत खडाखडे कुटुंबातील सोनाबाई खडाखडे आणि सीताबाई खडाखडे यांच्यात सामना झाला. त्यात सीताबाई खडाखडे विजयी झाल्या आणि सरपंच झाल्या. आईचा पराभव झाल्याने धरेपा खडाखडे यांनी सीताबाईंनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सीताबाई खडाखडे यांचे पद रद्द ठरवले.
advertisement
पती आणि सासूने दिली साथ, ती बनली स्कूल व्हॅन ड्रायव्हर, सोलापूरच्या उज्वला यांची अनोखी कहाणी
पोलीस पाटीलकीही गेली
सीताबाई खडाखडे यांचे पद गेल्याने त्यांचा मुलगा सूरज खडाखडे दुखावला. त्यानेही 14 महिन्यांपूर्वीच पोलीस पाटीलकी मिळवलेल्या धरेपाविरोधात जात प्रमाणपत्र सादर न केल्याचीच तक्रार दिली. प्रांताधिकाऱ्यांनी धरेपाला वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची नोटीस बजावली. सुनावणीदरम्यान धरेपाने प्रमाणपत्र सादर न केलेल्या सर्वांनाच अपात्र करण्याची मागणी प्रांताधिकाऱी सुमित शिंदे यांच्याकडे केली. त्यामुळे धरेपा खडाखडे यांच्यासोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मगनोळीच्या पोलीस पाटील अश्विनी घंटे यांनाही पोलीस पाटील पद गमावण्याची वेळ आली.
भावकीच्या वादात गेली दोन्ही पदे
दरम्यान, भाऊबंदकीच्या वादात खडाखडे कुटुंबाने एकाचवेळी दोन्ही पदे गमावली. विशेष म्हणजे एकाचवेळी एकाच कारणाने दोन्ही पदे गमावण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना घडलीये. दुसरीकडे खडाखडे कुटुंबाच्या वादात इतरांवरही पोलीस पाटील पद गमावण्याची वेळ आलीये.