ऑपरेशन सिंदूर राबवण्याची सुरुवातीची जबाबदारी एनएसए प्रमुख अजित डोभाल यांनी घेतली. डोभाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अनेकदा भारताने पाकिस्तानला बेचीराख केलं आहे. या हल्ल्यानंतर भारतीय राझीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अभिनेत्री आलिया भट्टने साकारलेली गुप्तहेर सेहमत ही भारतीय मुलगी जिनं 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी पाकिस्तानात जाऊन भारतासाठी हेरगिरी केली. कोण होती भारतीय सेहमत जिच्यापुढ्यात पाकिस्तानलाही गुघडे टेकवावे लागले. आलिया भट्टने साकारलेली त्या मुलीची खरी कहाणी पाहूयात.
advertisement
( देश साखर झोपेत, भारताचा पाकवर Air Strike; रितेश देशमुखचं 3 वाजून 2 मिनिटांनी ट्विट )
'राझी' हा चित्रपट 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर आधारित आहे. ही कांदबरी माजी नौदल अधिकारी हरिंदर सिक्का यांनी लिहिली होती. ही कादंबरी एका भारतीय काश्मिरी मुलीवर आधारित आहे. ही कहाणी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातील आहे. त्या वेळी भारतीय लष्कराला पाकिस्तानातील हालचाली समजून घेण्यासाठी एका गुप्तहेराची गरज होती.
काश्मीरमधील एका व्यावसायिकाने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला, सेहमतला देशासाठी गुप्तहेर बनण्यास राजी केले. विशेष म्हणजे सेहमत ही व्यावसायिक गुप्तहेर नव्हती ती एक सामान्य मुलगी होती पण देशासाठी काहीही करायला तयार होती.
सेहमतचे लग्न पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सेहमतचे लग्न एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लावण्यात आले. लग्नानंतर ती पाकिस्तानात आपल्या सासरी गेली. तिथे राहून तिने भारताला अत्यंत गोपनीय माहिती दिली.
हरिंदर सिक्का लिखित 'Calling Sehmat' या पुस्तकानुसार सेहमतने दिलेल्या माहितीतून भारताने अनेक मोठ्या संकटांपासून स्वतःचा बचाव केला.
दोन वर्षे पाकिस्तानात, परतली तेव्हा होती गरोदर
सेहमत त्या काळात 2 वर्षे पाकिस्तानात आपल्या सासरच्यांमध्ये राहिली. या काळात तिने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या गुप्त माहितीचा पुरवठा केला. युद्ध जवळ येत असताना ती भारतात परतली तेव्हा ती गरोदर होती. नंतर तिने एका मुलाला जन्म दिला जो पुढे भारतीय लष्करात अधिकारी झाला.
लेखक हरिंदर सिक्का यांना कशी मिळाली सेहमतची कहाणी?
कारगिल युद्धाबाबत संशोधन करताना हरिंदर सिक्का यांची भेट सेहमतच्या मुलाशी झाली. त्या वेळी त्याला आपल्या आईच्या साहसाची माहिती मिळाली. त्यानंतर सिक्का यांनी ‘Calling Sehmat’ हे पुस्तक लिहिले.
हरिंदर सिक्का यांनी सांगितले की, सेहमतने भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दिलेल्या सर्व माहितीची पडताळणी केली गेली आणि ती पूर्णपणे खरी ठरली. मला हे पुस्तक लिहिण्यास 8 वर्षे लागली.
सेहमतला केवळ संपर्क साधण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. पण तिने त्याही पलीकडे जाऊन गोपनीय कागदपत्रे, हालचालींची माहिती मिळवून भारताला दिली.
सिक्का म्हणतात की, जर Calling Sehmat हे पुस्तक लिहिण्यात आलं नसतं तर सेहमतची कहाणीही इतर अनेक गुप्तहेरांप्रमाणे कधीच समोर आली नसती. एक सामान्य मुलगी जी प्रेमाने नव्हे तर देशभक्तीच्या प्रेरणेने शत्रू देशात जाऊन राहिली. ही कहाणी आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायक ठरते.