मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमी येथे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी दाखल होतात. या अनुयांपैकी अनेक अनुयायी 5 डिसेंबर रोजी येथे येऊन स्थायिक होतात. यामध्ये अनेक तरुण मंडळी देखील असतात.
कोल्हापूरहून आलेली मंडळी गेल्या दहा वर्षांपासून संविधानाचा प्रसार करत आहेत. संविधान अंगीकारने, त्याची अंमलबजावणी करणे तसेच विधायक हस्तक्षेप करण्याचं काम ही मंडळी करतात. सोप्या भाषेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहोचवणं हा यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. संविधानाबद्दल लोकांच्या मनात काही ना काही शंका असतात, त्याचे निरासन करतात. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संविधानिक पद्धतीने वागणे याची जाणीव ही मंडळी सर्वांना करून देतात.
advertisement
Pushpa 2 Movie Review : एक्शन आणि इमोशनल एकत्र! पुष्पा 2 पाहून कोल्हापूरकर काय म्हणाले…Video
तरुण मंडळी पैकी राजवैभव शोभा रामचंद्र सांगतो 'चैत्यभूमीवर आल्यानंतर वर्षभर पुरणारी ऊर्जा जी चळवळीसाठी जी लोकांच्या भल्यासाठी म्हणून घेऊन जायचं. हिच उर्जा इथून सर्वसामान्य लोकं घेऊन जातात. इथल्या लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संविधान संवाद आम्ही करणार आहोत.'
या शिवाय रुपेश शोभा अनुभव सांगताना नमूद करतो की "बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण उद्या जर तुम्ही पाहिले तर नऊवारी साडी घातलेली स्त्री डोक्यावर संविधानाची प्रत ठेवून जात असते. हे कुठेही बघायला मिळत नाही फक्त इथे बघायला मिळतं. संविधान पोहोचवण्याचे मोठं व्यासपीठ दादरमधील चैत्यभूमी हा परिसर आणि इथे जमलेल्या समुदाय आहे.'
5 डिसेंबर दादरमध्ये दाखल झालेल्या जनसमुदायासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर, राहण्याची सोय अशा वेगवेगळ्या सोयी केल्या जातात. पालिकेतर्फे शासनातर्फे या ठिकाणी अनुयायांसाठी नेहमीच सुविधा देखील असतात.





