भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, वेअर, तुळशी आणि मध्य वैतरणा ही सात प्रमुख धरणं मुंबईला पाणीपुरवठा करतात. यापैकी मोडक सागर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून 100 टक्के जलसाठा गाठला आहे. मध्य वैतरणा धरणामध्ये सध्या 93.47 टक्के पाणीसाठा असून, तेथील पाण्याची पातळी गेल्या 24 तासांत दोन मीटरने वाढली आहे. सध्या या धरणात 1,80,890 दशलक्ष लिटर पाणी जमा आहे.
advertisement
Pune Water: पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन संपलं, पाणीपुरवठा करणारं कोणतं धरण किती भरलं?
मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सोमवारी मध्य वैतरणा तलावाच्या पातळीत वाढ झाल्यानंतर मोडक सागरच्या तीन दरवाजांद्वारे खालच्या जलाशयात पाणी सोडण्यात आले. सध्या मोडक सागर धरणाची पातळी 94.82 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या भागात गेल्या 24 तासांत 25 मिमी पावसाची नोंद झाली.
सध्या वेहार (47.68 टक्के) आणि तुळशी (46.97 टक्के) वगळता सर्व धरणे 60 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात एकूण पाणीसाठा केवळ 18.73 टक्के होता. यंदा पावसाळा वेळेआधी सुरू झाल्यामुळे धरणांमध्ये भरपूर पाणी साठवण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील सात दिवसांत महाराष्ट्र, गोवा आणि कोकण भागात मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात उर्वरित धरणांमध्येही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.