TRENDING:

New Hit And Run Law : आता अपघात करून पळू नका, 7 लाखांचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास, केंद्र सरकारच्या नव्या कायद्यात नेमकं काय?

Last Updated:

देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्स केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या हिट अँड रन कायद्याचा निषेध व्यक्त करत असून तीन दिवसाच्या संपावर गेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला असून औपनिवेशिक काळातील गुन्हेगारी कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या कायद्यात केलेल्या बदलांमुळे हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे. ज्यामुळे देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त करत असून तीन दिवसाच्या संपावर गेले आहेत.
आता अपघात करून पळू नका, 7 लाखांचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास, केंद्र सरकारच्या नव्या कायद्यात नेमकं काय?
आता अपघात करून पळू नका, 7 लाखांचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास, केंद्र सरकारच्या नव्या कायद्यात नेमकं काय?
advertisement

केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 7 लाखांचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता.

हिट अँड रनच्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह देशातील अनेक राज्यांचे खासगी बसचालक एकवटले असून ते आज 1 जानेवारी रोजी संपावर गेले आहेत, तर ऑटोचालकांनीही नव्या कायद्याविरोधात मोर्चा उभारला आहे. नवीन कायदा हा चालकांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करेल तसेच नवोदित ड्रायव्हर्सना सुद्धा या क्षेत्रामध्ये नोकऱ्या घेण्यापासून परावृत्त करू शकेल असा आरोप ट्रकचालक करत आहेत.

advertisement

भारतातील TOP 5 सरकारी शाळा, जिथे मुलांना शिकवण्याचं प्रत्येक पालक पाहातात स्वप्न

ट्रक चालकांचे म्हणणे आहे की, "कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही, तसेच जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेला जमाव त्यांना मारहाण करेल", तेव्हा ट्रक चालक संघटनांकडून हा ‘काळा कायदा’ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. तसेच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसल्याने गाडी चालकांना समोरचे दृश्य दिसत नाही, अशावेळी अनेक अपघात होतात. परंतु या परिस्थितीमुळे जर चालकाच्या हातून अपघात झाला तरी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली जाऊ शकते, अशी भीतीही ट्रक आणि बसचालकांनी व्यक्त केली.

advertisement

केंद्राच्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी आणि रोडवेज बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बस सुरू करणार नसल्याचे बसचालक कुलदीप सिंग मान यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

ट्र्क ड्रायव्हर्सच्या संपामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान :

advertisement

ट्रक संपामुळे हनुमानगड ते अबोहर आणि संगरिया ते श्रीगंगानगर, चित्तोडगड यासह अनेक मार्गांवर रस्ते आणि खाजगी बस वाहतूक बंद आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.व्यापारी दीपक खुराणा यांनी सांगितले की, येथे किन्नूचे बंपर पीक आले आहे. तसेच हे पीक 5 ते 6 दिवसात खराब होते अशावेळी ट्रक ड्रायव्हर्सच्या संपामुळे नुकसान होऊ शकते.

advertisement

मराठी बातम्या/देश/
New Hit And Run Law : आता अपघात करून पळू नका, 7 लाखांचा दंड आणि 10 वर्ष तुरुंगवास, केंद्र सरकारच्या नव्या कायद्यात नेमकं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल