भारतातील TOP 5 सरकारी शाळा, जिथे मुलांना शिकवण्याचं प्रत्येक पालक पाहातात स्वप्न
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हालाही या शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती हवी. चला तर मग जाणून घेऊया भारतातील त्या 5 प्रकारच्या टॉप स्कूल कोणत्या आहेत.
मुंबई : प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना खूप चांगला किंवा देशातील चांगल्या शाळेत शिकवावं. पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. अनेकांना या शाळांबद्दल माहिती देखील नसते. पण आज आम्ही तुम्हाला देशातील 5 अशा शाळा सांगणार आहोत, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा कोणत्याही खासगी शाळांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेणे इतके सोपे नाही.
जर तुम्हालाही या शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती हवी. चला तर मग जाणून घेऊया भारतातील त्या 5 प्रकारच्या टॉप स्कूल कोणत्या आहेत.
केंद्रीय विद्यालय या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. ही शाळा केंद्रीय विद्यालय संघटना चालवते. या शाळांची कमान भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडे आहे. सध्या भारतात एकूण 1250 केंद्रीय विद्यालये (Kendriya Vidyalaya) आहेत. याशिवाय काठमांडू, मॉस्को आणि तेहरान येथे प्रत्येकी एक केंद्रीय विद्यालय आहे. येथे, प्रवेश परीक्षा आणि लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जातात.
advertisement
यानंतर राजकिय प्रतिभा विकास विद्यालय (Rajkiya Pratibha Vikas Vidyalaya) येते. या शाळा दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयामार्फत चालवल्या जातात. येथे दरवर्षी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की प्रवेश परीक्षेद्वारे फक्त 6 वी आणि इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश दिला जातो. याशिवाय, आणखी एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे की 2021-22 पासून राजकिया प्रतिभा विकास विद्यालय (RPVV) चे नाव बदलून स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स (SoSE) असे करण्यात आले आहे.
advertisement
जवाहर नवोदय विद्यालय देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पूर्णपणे निवासी आणि सह-शैक्षणिक शाळा आहेत. या स्वायत्त संस्था चालवतात. या शाळांमध्ये सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. याशिवाय या शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न आहेत. येथे इयत्ता 6 वी, 7 व 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवले जाते. तर इयत्ता 9वी पासून महिन्याला 600 रुपये शुल्क आकारले जाते.
advertisement
आता दिल्ली सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या दिल्ली स्कूल ऑफ एक्सलन्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने अशा 100 शाळा बांधण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सध्या राजधानीत केवळ 5 उत्कृष्ट शाळा आहेत. येथे नर्सरी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळतो. दिल्ली, रोहिणी सेक्टर 17 आणि सेक्टर 23, खिचडीपूर, कालकाजी, मदनपूर खादर आणि द्वारका सेक्टर 22 मध्ये 5 उत्कृष्ट शाळा आहेत.
advertisement
सैनिक स्कूल Sainik School या सर्व शाळा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या सैनिक स्कूल सोसायटीद्वारे चालवल्या जातात. या शाळा 1961 मध्ये सुरू झाल्या. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन यांनीच 1961 मध्ये ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या शाळांमध्ये पूर्वी फक्त मुलांनाच प्रवेश दिला जात होता, पण 2021-2022 पासून मुलींनाही सहाव्या वर्गात प्रवेश दिला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 7:21 PM IST