TRENDING:

Mahesh Manjrekar : '...तर मी मुंबई सोडून जाईन', ठाकरे बंधूंसमोर असं का म्हणाले महेश मांजरेकर?

Last Updated:
Mahesh Manjrekar on Mumbai : अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबई सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर ते असं का म्हणाले?
advertisement
1/8
'...तर मी मुंबई सोडून जाईन', ठाकरे बंधूंसमोर असं का म्हणाले महेश मांजरेकर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यात खासदार संजय राऊत यांच्याबरोबर अभिनेते महेश मांजरेकर यांचाही मोठा वाटा आहे. महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असतानाच राज ठाकरे यांच्या मनात पहिल्यांदा ही गोष्ट आली होती.
advertisement
2/8
दरम्यान निवडणूकांचे वारे वाहत असताना अभिनेते महेश माजंरेकर यांनी खासदार संजय राऊत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर यांनी मला मुंबई सोडावीशी वाटतेय असं म्हटलं. महेश मांजरेकर असं का म्हणाले?
advertisement
3/8
मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले,"एक मुंबईकर म्हणून आज मी जेव्हा घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. काही गोष्टी मी नियमित फॉलो करतो."
advertisement
4/8
"आजचा एअर क्लालिटी इंडेक्स 183 आहे. मला कुणी पर्याय दिला की, कुठं तरी दुसरीकडं जा, तर मी लगेच जाईन. कारण आज मला बाहेर पडल्यावरही त्रास होतो."
advertisement
5/8
"त्या मुंबईसाठी म्हणून काय करता येईल? एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली तर कसं होईल, तशी मुंबईची अवस्था आहे. आज मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 31 लाख आहे. ही मुंबई डिकन्जेस्ट कधी होणार", असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला.
advertisement
6/8
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला विचारतो तुम्ही इतके वर्ष मुंबईत राहता. माझा आणि राजचा जन्म मुंबईतीलआहे. आज मुंबईत प्रदूषण, हवेचा निर्देशांक एवढा खराब कधी झाला होता का?"
advertisement
7/8
"हे विचारण्याचं कारण म्हणजे भाजप वाल्यांनी विकासाच्या प्रसाराची जी होर्डिंग्ल लावली आहेत ही विकासाची गती नाही तर विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास, हे तुमच्या त्रासाचं कारण आहे. तुम्ही जे म्हणताय ना, आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते.”
advertisement
8/8
त्यावर पुन्हा महेश मांजरेकर म्हणाले, "माझं म्हणणं आहे आता विकास नको. विकास करायची मुंबई सोय राहिलेली नाही. मुंबईत कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे. आपण जो श्वास घेतोय त्यातून ऑक्सिजनपेक्षा कार्बन घेतोय. मुंबईत जे लोंढे आले आहेत त्यांना राहू द्या पण जे येणार आहे ते तरी थांबवायला हवेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Manjrekar : '...तर मी मुंबई सोडून जाईन', ठाकरे बंधूंसमोर असं का म्हणाले महेश मांजरेकर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल