Ranji Trophy : 30 कोटीच्या तीन धाकड खेळाडूंना पव्हेलियन रस्ता दाखवला, कोण आहे Parth Rekhade?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई अजून विदर्भापासून 150 धावा दूर आहे. आणि त्यांच्या हातात अजून 3 विकेट आहेत. त्यामुळे आता विदर्भ मुंबईला ऑल आऊट करण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
1/6

पार्थ रेखाडे असे या विदर्भाच्या गोलंदाजाचे नाव आहे. पार्थने मंगळवारी मुंबईच्या अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या स्टार खेळाडूंची विकेट घेतली आहे. विशेष म्हणजे पार्थने एकाच ओव्हरमध्ये या तीन खेळाडूंना गुंडाळले आहे. त्यामुळे आता त्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
2/6
मुंबईच्या पहिल्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती. मुंबईचे सुरूवातीला दोन विकेट पडल्यानंतर विदर्भाच्या पार्थ रेखाडे नावाच वादळ मैदानात उतरलं आणि त्याने कर्णधार अजिंक्य रहाणेला 18 धावा आणि सुर्यकुमार यादव, शिवम दुबेला शुन्यावर बाद केले. त्यामुळे एकाच ओव्हरमध्ये मुंबईला मोठे धक्के बसले.
advertisement
3/6
दरम्यान आयपीएलसमध्ये या तीनही खेळाडूंना कोटींची बोली लागली आहे. कोलकत्ताने अजिंक्य रहाणे 1.5 करोड खरेदी केले आहे. सुर्यकुमार यादवला 16.35 करोड रूपयांना खरेदी करत मुंबईने संघात कायम ठेवले.तर चेन्नईमे 12 करोडला शिवम दुबे संघात कायम केले. त्यामुळे आयपीएलमध्ये भाव खाऊन जाणाऱ्या खेळाडूंना पार्थने आऊट केले आहे.
advertisement
4/6
दरम्यान डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडेने एका षटकात तीन बळी घेतल्याने विदर्भाने मंगळवारी गतविजेत्या मुंबईविरुद्ध रणजी करंडक उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत केले. विदर्भाच्या 383 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर पहिल्या डावात 7 बाद 188 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही 195 धावांनी मागे आहेत.
advertisement
5/6
मुंबईने आता 7 विकेट गमावून 200 धावा पूर्ण केल्या आहेत. आकाश आनंदने मुंबईचा डाव सावरून ठेवला आहे, तो सध्या त्याच्या शतकाच्या नजीक आहे. तर त्याला तनुश कोटीयन मैदानावर साथ देत आहे.
advertisement
6/6
मुंबई अजून विदर्भापासून 150 धावा दूर आहे. आणि त्यांच्या हातात अजून 3 विकेट आहेत. त्यामुळे आता विदर्भ मुंबईला ऑल आऊट करण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : 30 कोटीच्या तीन धाकड खेळाडूंना पव्हेलियन रस्ता दाखवला, कोण आहे Parth Rekhade?