TRENDING:

Chanakya Niti : प्रेमात या गोष्टी असतील तर समजून जा नातं काही टिकणार नाही

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : राजकारण आणि जीवनाचे महान अभ्यासक मानले जाणारे चाणक्य यांनी प्रेम संबंधांबद्दलही खोलवरच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे कोणतंही नातं आतून पोकळ होतं.
advertisement
1/9
Chanakya Niti : प्रेमात या गोष्टी असतील तर समजून जा नातं काही टिकणार नाही
प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पण जेव्हा चुकीच्या गोष्टी किंवा सवयी त्यात सामील होतात तेव्हा हे प्रेम हळूहळू तुटू लागतं. जर या गोष्टी वेळीच समजल्या नाहीत तर चांगलं नातंही बिघडू शकतं. चाणक्य नीतीनुसार जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या असतील कोणतंही प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही.
advertisement
2/9
ज्या नात्यात एकमेकांच्या हिताचा विचार करण्याऐवजी फक्त स्वतःचा फायदा पाहिला जातो, ते नातं लवकर तुटतं. चाणक्य म्हणाले प्रेम तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात नि:स्वार्थीपणा असतो. स्वार्थी प्रेम हे फक्त एक दिखावा असतं. असं प्रेम वेळेसोबत संपतं.
advertisement
3/9
चाणक्य म्हणतात की जिथं खोटं वारंवार बोललं जातं तिथं विश्वास असू शकत नाही. फसवणूक करणारा माणूस फक्त स्वतःच्या फायद्यासाठी प्रेम करतो. प्रेमात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतंही नाते मजबूत असू शकत नाही.
advertisement
4/9
जो माणूस प्रत्येक गोष्टीवर संशय घेतो तो प्रेमाला विष देतो. चाणक्यच्या मते जिथं विश्वास नाही तिथं प्रेम टिकू शकत नाही. शंका हळूहळू नातं नष्ट करतं. प्रेमातील विश्वासाचा पाया मजबूत असला पाहिजे.
advertisement
5/9
प्रेमात आदर खूप महत्त्वाचा असतो. जर कोणी आपल्या जोडीदाराचा वारंवार अपमान करत असेल किंवा कठोर शब्द बोललं तर नातं तुटू लागतं. चाणक्यनीती म्हणते की शब्द सर्वात खोल जखमा करतात. असं प्रेम फक्त वेदना देतं.
advertisement
6/9
जर एखाद्या प्रियकराची वारंवार इतरांशी तुलना केली गेली तर नातं ताणलं जातं. मत्सर आणि तुलना प्रेमाची गोडवा नष्ट करतं. चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्ती खास असते. नात्यात स्वीकृती आवश्यक असते.
advertisement
7/9
चाणक्य नीतीनुसार, जे आपलं वचन पाळत नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. जेव्हा कोणी आपलं वचन वारंवार मोडतं तेव्हा हृदय तुटतं. प्रेमात केवळ शब्दच नाही तर कृतीदेखील महत्त्वाची असते. वचन पाळल्याने विश्वास अबाधित राहतो.
advertisement
8/9
प्रेमात वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जर जोडीदारासाठी वेळ काढला नाही तर भावना कमी होऊ लागतात. ळेचा अभाव नातेसंबंध संपुष्टात आणू शकतो.
advertisement
9/9
सूचना : हा लेख सर्वसामन्य माहितीसाठी देण्यात आला आहे. जो चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : प्रेमात या गोष्टी असतील तर समजून जा नातं काही टिकणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल